AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात केस गळती का वाढते? त्यामागील ‘या’ मिथकांवर ठेवू नका विश्वास

आजकाल केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. त्यात ही समस्या महिलांमध्ये जास्त दिसून येते. तर अशा परिस्थितीत केस गळतीबद्दल अनेक मिथक आहेत ज्यावर अनेकजण आंधळेपणाने विश्वास ठेवतात, तर या लेखात केस गळतीच्या समस्येशी संबंधित काही गैरसमज आहेत ते जाणून घेऊया.

उन्हाळ्यात केस गळती का वाढते? त्यामागील 'या' मिथकांवर ठेवू नका विश्वास
केस गळतीImage Credit source: Boy_Anupong/Moment/Getty Images
| Edited By: | Updated on: May 28, 2025 | 3:12 PM
Share

बदलती जीवनशैली आणि बदलते हवामान यामुळे यासर्वांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. एवढेच नाही तर यांचा परिणाम आपल्या केसांवर देखील होत आहे. कारण उन्हाळ्यात केस गळतीचे प्रमाण जास्त असते हे तुम्ही अनेकदा लक्षात घेतले असेल. या दिवसांमध्ये तीव्र सूर्यप्रकाश, धूळ आणि घामामुळे यांचा परिणाम आपल्या केसांवर होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात आपल्याला खूप घाम येतो, ज्यामुळे धुळीमुळे आपले स्कॅल्प ओले आणि खराब होऊ शकते. यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस गळू लागतात. त्यातच सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कामुळे केस कोरडे होतात आणि खराब होतात आणि यामुळे केस गळण्याची समस्या देखील उद्भवू शकते.

उन्हाळ्यात केस गळतीबद्दल अनेक गैरसमज आहेत, ज्यावर लोकं सहसा विश्वास ठेवतात आणि त्यांना वाटते की त्यांचे केस यामुळे गळत आहेत. केस गळतीचे मुख्य कारण म्हणजे अनहेल्दी खाण्याच्या सवयी आणि केसांवर कोणत्याही प्रकारच्या प्रोडक्टचा वापर करतात.

केस गळतीशी संबंधित काही गैरसमज

केसांना तेल लावल्याने केस गळती थांबते

केसांना तेल लावल्याने स्कॅल्प कोरडे पडत नसल्याकारणाने केस गळण्याची समस्या उद्भवत नाही असे जर तुमचे म्हणणे असेल तर ते पूर्णपणे चुकीचे ठरेल. जर तुम्हाला केस गळतीचा त्रास होत असेल, तर केसांचे तेल बदलण्यापूर्वी तुम्हाला तुमचा आहार आणि जीवनशैली सुधारण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. फक्त केसांचे तेल बदलल्याने तुमचे केस गळणे थांबणार नाही.

केसांना तेल लावल्याने कोंडा कमी होतो

केसांना तेल लावणे हे केसांच्या कंडीशनिंगसाठी अत्यंत आवश्यक आहे. पण याचा अर्थ असा नाही की ते कोंड्याची समस्या दूर करण्यास मदत करू शकते. केसांची तेले केसांच्या वाढीला चालना देऊ शकतात. पण याचा अर्थ असा नाही की गळणारे केस परत वाढतील किंवा कोंडा निघून जाईल. ही देखील एक मिथक आहे.

केस घट्ट बांधून झोपल्याने केस गळती थांबते

केस घट्ट बांधून किंवा वेणी घालून झोपल्याने केस गळती थांबते या गोष्टीत अजिबात तथ्य नाही. तुम्हाला केस उघडे ठेवून झोपायचे की वेणी बांधून झोपायचे हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. तुम्ही तुमचे केस तुम्हाला हवे तसे ठेवू शकता. तर केसांना घट्ट वेण्यांमध्ये बांधल्याने मुळे कमकुवत होतात ज्यामुळे केस कमकुवत होतात आणि केस मुळापासून तुटण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो रात्री झोपताना घट्ट वेणी बांधून झोपू नये.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत