AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टोल नाक्यावरचा निष्काळजीपणा भोवला, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

मलकापूर जवळ ट्रक आणि आयशर गाडीचा भीषण अपघात होऊन त्यामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लकापूर जवळील तलासवाडा फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. या अपघातामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत

टोल नाक्यावरचा निष्काळजीपणा भोवला, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Mar 08, 2024 | 1:22 PM
Share

बुलढाणा | 8 मार्च 2024 : मलकापूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मलकापूर जवळ ट्रक आणि आयशर गाडीचा भीषण अपघात होऊन त्यामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लकापूर जवळील तलासवाडा फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. या अपघातामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खानदेश विदर्भ सीमेवर तालसवाडा जवळ राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. ट्रक आणि आयशर गाडीची जोरदार धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात अन्य एक जण जखमी झाला आहे. मृतांची अथवा जखमी व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकलेलं नाही. अपघाताचाची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेत मोठ्या प्रमाणात मदतकार्य सुरू केलं आहे. मात्र या अपघातामुळे विदर्भ खानदेश महामार्गावर गेल्या दोन तासांपासून वाहतूक खोळंबली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान टोल नाक्याच्या निष्काळजीपणामुळे एकतर्फी वाहन सुरू असल्याने हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे

अखेर भाजपचा गटनेता ठरला! गणेश खणकरांची वर्णी
अखेर भाजपचा गटनेता ठरला! गणेश खणकरांची वर्णी.
... म्हणून हा कट शिजला, अन् ठिणगी पडली! विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
... म्हणून हा कट शिजला, अन् ठिणगी पडली! विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप.
अजितदादांनी भाजपच्या फाईलवर भाष्य केलं अन् 10 दिवसाने अपघात झाला...
अजितदादांनी भाजपच्या फाईलवर भाष्य केलं अन् 10 दिवसाने अपघात झाला....
सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळावर पोहोचल्या
सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळावर पोहोचल्या.
कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी शेतात, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी शेतात, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.
त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं.
विलीनीकरण ठरलंच नाही! फडणवीसांनी थेट 'तो' दावाच खोडला!
विलीनीकरण ठरलंच नाही! फडणवीसांनी थेट 'तो' दावाच खोडला!.
Union Budget 2026 : केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय काय?
Union Budget 2026 : केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय काय?.
आधी गोंधळ, नंतर स्पष्टीकरण! पीयूष गोयल यांच्या वक्तव्यानं काय घडलं?
आधी गोंधळ, नंतर स्पष्टीकरण! पीयूष गोयल यांच्या वक्तव्यानं काय घडलं?.
विलीनीकरणच विलीन? दादांचे नेते काय बोलून गेले?
विलीनीकरणच विलीन? दादांचे नेते काय बोलून गेले?.