AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील 500 कंपन्यांचा गळा कोण घोटतंय? वाचा सविस्तर रिपोर्ट

कोरोनाच्या तडाख्यामुळे अनेक कंपन्यांनी आपला कारभार बंद करण्यासाठी अर्ज केल्याची बातमी वाचायला मिळाली. यामुळे बेरोजगारी प्रचंड वाढेल. | 500 companies in Maharashtra

महाराष्ट्रातील 500 कंपन्यांचा गळा कोण घोटतंय? वाचा सविस्तर रिपोर्ट
| Updated on: Dec 18, 2020 | 11:20 AM
Share

मुंबई: कोरोना संकटामुळे (Coronavirus) राज्यातील तब्बल 500 कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. त्यांनी ट्विट करून यासंदर्भात भाष्य केले. (Rohit Pawar on 500 companies in Maharashtra planning for wind up)

आधी नोटबंदी, त्यानंतर जीएसटीची घाईघाईने अंमलबजावणी केल्याने कंपन्यांची आर्थिक घडी विस्कटली होती. मात्र, आता कोरोनाच्या तडाख्यामुळे अनेक कंपन्यांनी आपला कारभार बंद करण्यासाठी अर्ज केल्याची बातमी वाचायला मिळाली. यामुळे बेरोजगारी प्रचंड वाढेल. महाविकासआघाडी सरकार यामधून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. पण या सगळ्यावर केंद्र व राज्याने मिळून मार्ग काढण्याची गरज असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

काय आहे नक्की प्रकरण?

कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक उद्योगांना फटका बसला आहे. जवळपास 500 उद्योजकांनी कंपन्या बंद करण्यासाठी नोंदणी कार्यालयाकडे अर्ज केले आहेत. नोटाबंदी आणि जीएसटी अंमलबजावणीतील घाईमुळे कंपन्यांची आर्थिक घडी अगोदरच विस्कटली होती.

मात्र, कोरोनामुळे या कंपन्यांचा उरलासुरला डोलाराही कोसळला. अशातच देशात आर्थिक मंदीचे ढग दाटल्याने उद्योजकांनी कंपनी बंद करण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते. कंपनी नोंदणी कार्यालयाकडे आलेल्या अर्जांपैकी १७५ कंपन्यांची नोंदणी रद्द करण्याबाबतचे निवेदन प्रसिद्ध झाले आहे.

संबंधित बातम्या:

बापाच्या नोकरीवर मुलाचा अधिकार तर मग विवाहित मुलीचा का नको ? काय म्हणालं कोर्ट

धूत कुटुंबाकडून ‘व्हिडीओकॉन’ निसटले, नवे मालक कोण?

(Rohit Pawar on 500 companies in Maharashtra planning for wind up)

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.