AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navi Mumbai Murder : दारू पिऊन त्रास देत असल्याने मित्रानेच केली मित्राची हत्या, उत्तर प्रदेशातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या

पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता रामायण ललसा हा दारु पिऊन त्रास द्यायचा म्हणून त्याच्या डोक्यात पेवरब्लॉक घालून त्याची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली. आरोपीला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Navi Mumbai Murder : दारू पिऊन त्रास देत असल्याने मित्रानेच केली मित्राची हत्या, उत्तर प्रदेशातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या
दारू पिऊन त्रास देत असल्याने मित्रानेच केली मित्राची हत्याImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 19, 2022 | 6:18 PM
Share

नवी मुंबई : दारु पिऊन त्रास द्यायचा म्हणून मित्रानेच मित्राची हत्या (Murder) केल्याची घटना नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये घडली आहे. रामायण ललसा उर्फ गुरुदेव उर्फ बाबा असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आरोपी मित्राला अटक (Arrest) केली आहे. अरुण कुमार भरती असे अटक करण्यात आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी उत्तर प्रदेशातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी त्याला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

हत्या करुन उत्तर प्रदेशात पळून गेला आरोपी

एपीएमसी मार्केटमध्ये 14 ऑगस्ट रोजी एका इसमाचा मृतदेह आढळला होता. एपीएमसी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी घटनेची नोंद करत प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासादरम्यान हा मृतदेह रामायण ललसा उर्फ गुरुदेव उर्फ बाबा या व्यक्तीचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास केला असता मयताच्या मित्रानेच त्याची हत्या केल्याची निष्पन्न झाले. रामायण ललसाची हत्या केल्यानंतर आरोपी उत्तर प्रदेशात पळून गेला होता.

आरोपीला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

पोलिसांनी उत्तर प्रदेशातून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता रामायण ललसा हा दारु पिऊन त्रास द्यायचा म्हणून त्याच्या डोक्यात पेवरब्लॉक घालून त्याची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली. आरोपीला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, आरोपीकडून याआधीही कोणता गुन्हा घडला आहे का ? याचा तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

नांदेडमध्येही दारुसाठी मारहाण करणाऱ्या तरुणाची आईकडून सुपारी देऊन हत्या

दारुसाठी मुलगा त्रास द्यायचा, शिवीगाळ आणि मारहाण करायचा म्हणून कंटाळलेल्या आईने सुपारी देऊन हत्या केल्याची घटना नांदेडमध्ये काल उघडकीस आली आहे. घरात भाड्याने राहणाऱ्या दोन भाडेकरुंना आईने 60 रुपयांची सुपारी दिली होती. त्यापैकी 10 हजार रुपये अॅडव्हान्स दिले होते. आरोपींनी तरुणाच्या डोक्यात वार करुन त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह बारड महामार्गाजवळ फेकला. अज्ञात मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी याचा तपास केला असता ही घटना उघड झाली. (A friend was killed by a friend who was harassing him by drinking alcohol in Navi Mumbai)

चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.