AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाषणाच्या मध्येच अजान सुरू झाली, मग गडकरींनी सर्वांची मनं जिंकली, पाहा सांगलीमध्ये नेमकं काय घडलं?

सांगलीच्या मिरजमध्ये नितीन गडकरी यांची प्रचार सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.

भाषणाच्या मध्येच अजान सुरू झाली, मग गडकरींनी सर्वांची मनं जिंकली, पाहा सांगलीमध्ये नेमकं काय घडलं?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
| Updated on: Nov 16, 2024 | 8:45 PM
Share
सांगलीच्या मिरजमध्ये केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांची प्रचार सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी राज्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती जनतेला दिली. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 12 हजार कोटी दिले, 9 कामं पूर्ण झाले 9 प्रगती पथावर आहेत. अजून कोट्यावधी रुपयांची कामे मंजूर केली आहेत, ती लवकरच सुरू होतील. मुंबई ते बंगळुरू पंचावन्न हजार कोटींचा प्रस्ताव मंजूर केला आहे, त्याच्या कामाला सुरुवात देखील झाली आहे. पुणे, बंगळुरू हा हायवे 800 किलोमीटर आहे. तुम्हाला सहा तासांमध्ये बंगळुरूवरून पुण्याला सहज पोहोचता येईल असा आपला प्रयत्न आहे.  सगळीकडे हिरवं पाहायला मिळाले,यामुळे मनापासून मला आनंद होत आहे. गावाच्या विकासासाठी पाण्याची खूप आवश्यकता आहे. गेल्या 30 वर्षांपासून आपण संवर्धनामध्ये  काम करत आहोत,  त्यामध्ये डॉक्टरेट पद देखील मिळालं आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.
दरम्यान नितीन गडकरी यांचे भाषण सुरू असतानाच मध्येच अजान सुरू झाली. अजान सुरू झाल्यानंतर नितीन गडकरी यांना भाषण थांबवण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर नितीन गडकरी यांनी देखील अजान संपेपर्यंत आपलं भाषण थांबवलं.
पुढे बोलताना नितीन गडकरी यांनी म्हटलं की, पश्चिम महाराष्ट्रातील ऊस कारखाने चालवणं म्हणजे मेरिटमधल्या विद्यार्थ्यांची शाळा आहे.  विदर्भ म्हणजे शंभर टक्के नापास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा आहे. आज नद्यांचे, तलावांचे खोलीकरण झाल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. नॉन युरीया खतामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचा खर्च कमी होणार आहे. इथेनॉल निर्मितीमध्ये सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यानं आता खऱ्या अर्थानं पुढाकार घेणं गरजेचं आहे. भविष्यात पेट्रोलची कमतरता भासू शकते, इंडियन ऑईल महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये इथेनॉलचे 400 पंप सुरू करणार आहेत, पाच कंपन्या इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करणार आहेत. शेतकऱ्यांनो तुमच्या मुलांनी जर इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या वापरल्या तरच तुमच्या उसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलची मागणी वाढणार आहे, असंही यावेळी नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही.....
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV.
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प.
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे...
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे....
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच...
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच....
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत...
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत....
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान.
चक्क 'अरे सोड रे...' म्हणत राऊतांनी पत्रकाराचा 'तो' प्रश्न धुडकावला
चक्क 'अरे सोड रे...' म्हणत राऊतांनी पत्रकाराचा 'तो' प्रश्न धुडकावला.