AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेब यांच्या निधनानंतर दिल्लीत काय षड्यंत्र सुरु होतं? उद्धव ठाकरे यांचा मोठा गौप्यस्फोट

बघा! ती किती हरामी लोकं आहेत. त्यांना वाटतं बाळासाहेब गेले. पण, आजही बाळासाहेब आपल्या मनात आहे. 2014 मध्ये दिल्लीत असा विचार सुरू होता. 2014 साली शिवसेनेला खतम करणारी ही लोकं. काय आम्ही तुमचा गुन्हा केला होता?

बाळासाहेब यांच्या निधनानंतर दिल्लीत काय षड्यंत्र सुरु होतं? उद्धव ठाकरे यांचा मोठा गौप्यस्फोट
UDDHAV THACKERAY, PM NARENDRA MODI Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Jan 23, 2024 | 9:26 PM
Share

नाशिक | 23 जानेवारी 2024 : शिवसेना ( ठाकरे गटाचे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथील सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले असे हे जे काही मिंधे बोलत आहेत. ते खुर्चीसाठी शेपूट हलवत बसतोय. अरे मिंध्या, तुझ्यासमोर महाराष्ट्र लुटला जातोय आणि तू शेपूट हलवत दिल्लीची चाकरी करत आहे. हे बाळासाहेबांचे विचार. हे बाळासाहेबांचं हिंदुत्व असा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

2013 साली हेच गृहस्थ उभे होते बिल्ला घालून. जे पक्षप्रमुखच नाही म्हणत होते तेच दाढी खाजवत पाया पडले होते. तुमचे आशीर्वाद ही शिवसेनेची घटना आहे. तुमच्याकडे शंकराचार्यांना मान नाही. मित्रांना मान नाही. मी शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडले असं म्हणत असतील तर 2014 साली शिवसेनेशी युती का तोडली होती असा सवाल त्यांनी भाजपला केला.

एकनाथ खडसे नाशिकमध्येच सांगितलं. 2014 मे पर्यंत यांचे ‘गले लग जा.’ सुरु होतं. राष्ट्रपतींच्या पत्रावर सही करायला मला दिल्लीत बोलावलं. तोपर्यंत शिवसेना हिंदुत्ववादी होती. नंतर, जुन ते ऑक्टोबर असं काय घडलं की तुम्ही शिवसेनेची युती तोडली. आजही ती व्यक्ती जिवंत आहे. भाजपमधील ती जबाबदार व्यक्ती आहे असे ते उद्धव ठाकरे म्हणाले.

2014 मध्ये भाजपने युती तोडली. शिवसेनेने कुणाच्याही मदतीशिवाय ६३ आमदार निवडून आले. हेच दाढीवाले बुवा विरोधी पक्षनेते होते. तेव्हा ती व्यक्ती आली आणि म्हणाली, उद्धव मला तुझं अभिनंदन करायचं आहे. म्हटलं का. तर म्हणाले, दिल्लीत अशी चर्चा होती. आता बाळासाहेब राहिले नाही. उद्धव ठाकरे काही करू शकत नाही. शिवसैनिक उद्धवसोबत जाणार नाहीत. आता वेळ आलीय शिवसेनेला संपवायचा. शिवसेनेचे 5 किंवा 10 सीट येतील. पण तू कमाल केली. तू 63 जागा आणल्या. दिल्ली आता तुला घाबरतेय, असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

बघा! ती किती हरामी लोकं आहेत. त्यांना वाटतं बाळासाहेब गेले. पण, आजही बाळासाहेब आपल्या मनात आहे. 2014 मध्ये दिल्लीत असा विचार सुरू होता. 2014 साली शिवसेनेला खतम करणारी ही लोकं. काय आम्ही तुमचा गुन्हा केला होता? असा सवाल त्यांनी भाजपला केला.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी