AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणत्या बड्या नेत्यांशी अण्णा हजारांचे हितगूज? उद्धव ठाकरे यांच्याशी नाही जुळले सूर, PM मोदींविषयी म्हणाले काय?

Anna Hazare Big Claimed : दिल्ली विधानसभा निवडणूक आणि महाकुंभाविषयी अण्णा हजारे यांनी त्यांचे मत मांडले आहे. राजकारणात नैतिकता आणि त्याग अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांचे वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे.

कोणत्या बड्या नेत्यांशी अण्णा हजारांचे हितगूज? उद्धव ठाकरे यांच्याशी नाही जुळले सूर, PM मोदींविषयी म्हणाले काय?
अण्णा हजारे
| Updated on: Feb 05, 2025 | 9:56 AM
Share

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मंगळवारी अनेक मुद्यांवर रोखठोक मतं मांडली. त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय, महाकुंभातील चेंगराचेंगरी, मोदी सरकारच्या कार्यकाळाविषयी थेट भाष्य केले. दिल्ली विधानसभा निवडणूक आणि महाकुंभाविषयी अण्णा हजारे यांनी त्यांचे मत मांडले आहे. राजकारणात नैतिकता आणि त्याग अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांचे वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे.

हा तर लोकांचा विश्वास

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार मोठ्या विजयासह सत्तेवर आले. त्यावर अण्णांनी भाष्य केले. लोकांच्या विश्वासामुळेच सरकार सत्तेवर आल्याचा दावा त्यांनी केला. कोणताही पक्ष वा संघटनेत आचार, विचारची शुद्धता, त्याग आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची आवश्यकता आहे. तेव्हाच जनता त्यांच्यावर विश्वास ठेवते. त्यांचे समर्थन करते, मतं देते, असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंबाबत मोठे विधान

राजकारणात योग्य दृष्टिकोन आणि नैतिकतेची गरज असते. जेव्हा लोक त्याग आणि सत्याच्या मार्गावर चालणारे नेते पाहतात. तेव्हा त्यांचे समर्थन करतात, असा दावा त्यांनी केला. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी प्रश्न विचारला असता, आपण त्यांच्या जवळ सुद्धा जात नसल्याची प्रतिक्रिया अण्णांनी दिली. राजकारणाशी आपले काही देणे घेणे नाही, असे ते म्हणाले. मी कोणत्याच पक्षाशी जोडलेलो नाही. पण कुठे चूक दिसत असेल तर आवाज उठवतो, सल्ला देत नाही, असे ते म्हणाले.

अध्यात्माची वेगळी व्याख्या

अण्णा हजारे यांनी धार्मिक दृष्टिकोनावर मत मांडलं. अध्यात्म माणसाला बदलू शकत नाही. केवळ गळ्यात माळ घातली, ती जपली म्हणजे माणूस धार्मिक होतो असे नाही. तर दु:खी आणि पीडितांची सेवा करणे हे खरं धार्मिक कार्य असल्याचे ते म्हणाले. हीच देवाची पूजा आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याचे जगण्याचे ध्येय माहित असेल तर समाज आणि देशाला फायदा होऊ शकतो.

पंतप्रधान मोदींची केले कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अण्णा हजारे यांनी कौतुक केले. त्यांनी अनेक चांगले कायदे आणले. भ्रष्टाचारावर अंकुश ठेवला. कायदे कठोर असेल तर समाजात सुधारणा होते, असे अण्णा म्हणाले. तर महाकुंभातील चेंगराचेंगरीबाबत, लोकांचा जसा चष्मा तसे दिसते असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.