AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : सरकारला ना वेदना, ना पश्चात्ताप… मग यांना काय टाळता येतं?; संजय राऊत यांचा अहमदाबाद अपघातावरून केंद्राला सवाल

एअर इंडियाच्या विमानाच्या भीषण अपघातात 265जणांचा मृत्यू झाला. संजय राऊत यांनी या घटनेवरून केंद्र सरकारवर टीका केली. त्यांनी अपघाताची जबाबदारी कोण घेणार याबाबत प्रश्न उपस्थित केले. राऊत यांनी विमानाच्या खरेदीसंदर्भातही भाजपवर आक्षेप घेतले. या दुर्घटनेने देशभर हळहळ व्यक्त होत आहे.

Sanjay Raut : सरकारला ना वेदना, ना पश्चात्ताप... मग यांना काय टाळता येतं?; संजय राऊत यांचा अहमदाबाद अपघातावरून केंद्राला सवाल
संजय राऊत यांचा अहमदाबाद अपघातावरून केंद्राला सवाल Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 13, 2025 | 10:46 AM
Share

लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला गुरूवारी दुपारी अहमदाबादमध्ये भीषण अपघात झाला. एअरपोर्टवरून टेक ऑफ केल्यावर काही क्षणात विमान खाली आलं आणि नागरी वस्तीतल्या मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं. यामध्ये विमानातील प्रवासी आणि वसतीगृहातील विद्यार्थी अशा एकूण 265 जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण देशासह जगभरातून हळहळ व्यक्त होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करत मृतांना श्रद्धांजी वाहिली.

मात्र माध्यमांशी संवाद साधत असतानात राऊत यांनी या घटनेवरून सरकारवरही निशाणा साधला. या अपघातात 241 प्रवासी मृत्यू पावतात, विमान ज्या मेडिकल हॉस्टेलवर कोसळले, त्यातील 24 डॉक्टर आणि मेडिकलचे अनेक विद्यार्थी मृत्यू पावतात. राखरांगोळी होते. मात्र इतकं होऊनही या अपघाताची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही. सरकारच्या चेहऱ्यावर दुखाची रेषा, वेदना, पश्चात्ताप दिसत नाही, अशा शब्दांत राऊत यांनी टीका करत केंद्रावर टीका केली.

काय म्हणाले राऊत ?

कालच्या अपघातानंतर संपूर्ण देश शोक मग्न आहे. एअर इंडियाचं विमान कोसळणं ही या देशातील हवाई वाहतूक करणाऱ्या प्रवाशांसाठी चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी घटना आहे. अत्यंत सुरक्षित समजलं जाणारं ड्रीमलाइनर हे टेक ऑफ नंतर एका मिनिटाच्या आत कोसळतं आणि त्यातील एक प्रवासी वगळता 241 प्रवासी मृत्यू पावतात. विमान ज्या मेडिकल हॉस्टेलवर कोसळले, त्यातील 24 डॉक्टर आणि मेडिकलचे विद्यार्थी मृत्यू पावतात. राखरांगोळी होते. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे माझेही राज्यसभेतील सहकारी होते. त्यांचंही निधन झालं. इतकं होऊनही या अपघाताची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही. रेल्वेचे अपघात होत आहेत, पहलगाम सारख्या दहशतवादी हल्ल्यात लोक बळी जात आहेत, विमानाचे अपघात होत आहे. पण सरकारच्या चेहऱ्यावर दुखाची रेषा, वेदना, पश्चात्ताप दिसत नाही.

मग यांना टाळता काय येतं?

कालच्या अपघातावर कोणी राजकारण करू नये. मृत पावलेले भारतीय असतील किंवा परदेशी नागरिक असतील. ते आपल्या भारतातून एअर इंडियाने प्रवास करत होते, लक्षात घ्या, यात भारतीय हवाई क्षेत्राची प्रतिष्ठा पणाला लागली. एअर इंडियाचं खासगीकरण सरकारने केलं आणि टाटाला दिलंय. टाटाने प्रत्येकी एक कोटी दिले म्हणून प्रश्न संपत नाही. इतका मोठा तांत्रिक बिघाड, जे विमान लंडनला चाललंय, दोन्ही इंजिन बंद पडतात, मी त्यातला एक्सपर्ट नाही, दोन्ही इंजिन बंद पडतात. कोणी म्हणतात पक्ष्याची धडक बसली. काही असो. चौकशी होईल ब्लॅक बॉक्स मिळाल्यावर. पण एवढा मोठा अपघात होतो. हा अपघात आहे, अपघात टाळता येत नाही, असं अमित शाह म्हणतात तेव्हा या देशावर कोणत्या प्रकारचं राज्य लादलेलं आहे हे दिसतं. रेल्वेचा अपघात टाळता येत नाही, पहलगामचा हल्ला टाळता येत नाही, अहमदाबाद सारखा भयंकर विमान अपघात टाळता येत नाही. मग यांना टाळता काय येतं? असा सवाल राऊतांनी विचारला.

परत सांगतो आम्हाला या विषयात राजकारण करायचं नाही. ड्रीमलायनर जेव्हा विकत घेतली तेव्हा त्याच्या खरेदी बाबत, तांत्रिक मुद्द्याबाबत प्रश्न उपस्थित करणारे भाजपचेच लोकं होते. आपण संसदेतील रेकॉर्ड पाहू शकता. प्रफुल्ल पटेल सिव्हिल एव्हिएशन मंत्री होते आणि त्यांना प्रश्न विचारणारे भाजपचे लोकं होते, एवढंच माझ्या स्मरणात आहे.

जबाबदारी कोण घेणार ?

भाजपनेच त्या काळात या ड्रीमलायनरवर आक्षेप घेतला होता. गैरव्यवहार खरेदीत झाला का? दबावाखाली ही खरेदी झाली का असे सवाल भाजपने तेव्हा केले होते. ३०० पेक्षा जास्त लोकांचे प्राण त्यात गेले. म्हणून आम्हाला चिंता वाटते. त्यामुळे प्रश्न उपस्थित करावे लागतात. यात १० ते १२ महाराष्ट्रातील लोक आहेत. जबाबदारी कोण घेणार आहे ? असा सवापही राऊतांनी विचारला.

चौकशी केली पाहिजे

३० सेकंदात विमान कोसळतं. २४२ प्रवाशी आहेत. ३० सेकंदात विमान कोसळतं याचा अर्थ ते विमान उड्डाणासाठी तंत्रज्ञानी त्याला ओके केलं आहे. त्याशिवाय ते लंडनला जाण्यासाठी उडणार नाही. तरीही ३० सेकंदात विमानाची दोन्ही इंजिन बंद पडतात. मग गडबड काय. याची चौकशी केली पाहिजे अशी मागणीही राऊतांनी केली.

Follow Us
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया.
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा...
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा....
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग.
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र...
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र....
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत.
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.