AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय घडणार होतं? शरद पवार यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाचं मोठं वक्तव्य

"अजित दादांच्या दु:खद घटनेतून कोणीही सावरलेलं नाही. उपमुख्यमंत्री पदाबाबत एकत्र पवार परिवार निर्णय घेईल आणि तो त्यांनी घ्यावा.जो काही निर्णय असेल त्याचं मी स्वागतच करेन" असं राजेश टोपे म्हणाले.

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय घडणार होतं? शरद पवार यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाचं मोठं वक्तव्य
Shashikant shinde
| Edited By: | Updated on: Feb 02, 2026 | 5:59 PM
Share

दोन दिवसांपूर्वी भीषण विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. हा फक्त पवार कुटुंब, राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का नाहीय. अख्ख्या महाराष्ट्राला अजितदादांच्या अचानक निघून जाण्याने दु:ख झालय. कोणी ध्यानीमनी विचार केला नव्हता अशी ही भयानक घटना आहे. नियतीने महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याला हिरावून नेलं. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पश्चात राजकीय वारसा कोण पुढे नेणार, याची चर्चा आता सुरु झालीय. या बद्दल वेगवेगळी मत व्यक्त होतं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्याची मागणी होत आहे. दरम्यान शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वप्रथम शशिकांत शिंदे यांनी अजित दादांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न अधुरं राहिलं म्हणून खंत व्यक्त केली. “मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत बैठका सुरू होत्या. या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनंतर हा महत्त्वाचा निर्णय अजितदादांनी घ्यायचं ठरवलं होतं.यासाठीच या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी बहुतांश जागेवर एकत्र लढताना पाहायला मिळत आहेत” असं शशिकांत शिंदे म्हणाले.

पवार कुटुंबाने एकत्र बसून निर्णय घ्यावेत

“जे काही निर्णय घ्यायचे आहेत. त्याविषयी पवार कुटुंबाने एकत्र बसून निर्णय घ्यावेत. सातारा जिल्ह्यात जो विकास झाला त्यामध्ये अजित दादांचा मोठा सहभाग होता” असं ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री पदाबाबत एकत्र पवार परिवार निर्णय घेईल

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचेच दुसरे वरिष्ठ नेते राजेश टोपे म्हणाले की, “अजित दादांच्या दु:खद घटनेतून कोणीही सावरलेलं नाही.दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही जनभावना सुद्धा आहे आणि दोन्ही पक्षाच्या वतीने त्याबाबतचे प्रयत्न पूर्वीसुद्धा झालेले आहेत” “पवार साहेब, सुनेत्रा वहिनी, तटकरे साहेब यांनी याबाबत निर्णय घ्यावा ही आमच्यासारख्यांची भावना आहे. दादा हयात असताना आमच्या ज्या बैठका झाल्या. त्यात त्यांची इच्छा होती की एकत्र यावं. त्या अनुषंगाने त्यांनी बऱ्याचदा आम्हाला बोलवून दाखवलं. एकत्र येणे दोन्ही पक्षाच्या दृष्टीने जास्त योग्य आहे” असं राजेश टोपे म्हणाले.

“Ncp अजितदादा पवार पक्षाच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यायचा असेल तो पवार परिवार घेईल. महानगरपालिका आणि काही जिल्हा परिषदा आमची यापूर्वीच चर्चा झाली असल्याकारणाने बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना घड्याळावर लढण्याची परवानगी दिली होती.उपमुख्यमंत्री पदाबाबत एकत्र पवार परिवार निर्णय घेईल आणि तो त्यांनी घ्यावा.जो काही निर्णय असेल त्याचं मी स्वागतच करेन” असं राजेश टोपे म्हणाले.

Follow Us
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? 9 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? 9 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी.
अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय
अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय.
मोठी अपडेट! राहुरीत गोविंद मोकाटेंनी EVM वर व्यक्त केला संशय, थेट...
मोठी अपडेट! राहुरीत गोविंद मोकाटेंनी EVM वर व्यक्त केला संशय, थेट....
हा लोकशाहीचा नव्हे, मोदी-शहांचा विजय; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
हा लोकशाहीचा नव्हे, मोदी-शहांचा विजय; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल.