AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रायगडावर शिंदेंना भाषणाची संधी, अजितदादांना डावललं? अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

रायगडावर ऐनवेळी एकनाथ शिंदे यांना संधी मिळाली तर अजित पवार यांचं भाषण झालं नाही, यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असतानाच आता यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.  

रायगडावर शिंदेंना भाषणाची संधी, अजितदादांना डावललं? अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 12, 2025 | 8:23 PM
Share

रायगड किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.  या कार्यक्रमात मोजकीच भाषणं असल्यामुळे या यादीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नावं नव्हती, मात्र ऐनवेळी एकनाथ शिंदे यांना संधी मिळाली तर अजित पवार यांचं भाषण झालं नाही, यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असतानाच आता यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?  

वेळ कमी होता, त्यामुळे मी काही भाषण केलं नाही, अशी प्रतिक्रिया यावर अजित पवार यांनी दिली आहे. दरम्यान अर्थ खात्याच्या फायली क्लिअर होत नाही, अशी तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे केली अशी माहिती समोर येत आहे. याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मला अमित शाह साहेब असं काहीही बोललेले नाहीत. हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा. या संदर्भात सकाळपासून ते अमित शाह मुंबईला निघेपर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. स्वत: देवेंद्र फडणवीस सोबत होते, एकनाथ शिंदे देखील सोबत होते.

एकनाथ शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले आहेत. त्याच्यामुळे ते तिकडे तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही. जर काही असेल तर ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील, मुख्यमंत्र्यांशी बोलतील. आम्ही वेगवेगळ्या महत्त्वाच्या निर्णयासंदर्भात एकत्र बसत असतो, बोलत असतो, चर्चा करतो, त्यातून मार्ग काढतो. दरम्यान यावेळी अजित पवार यांना रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत देखील प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले त्या बद्दल काही काळजी करण्याच कारण नाही. सगळं व्यवस्थित चाललं आहे. काळजी करण्याचं कारण नाही, त्यावर मार्ग निघेल, मार्ग निघाल्यावर तुम्हाला सांगितलं जाईल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Follow Us
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया