AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विश्वास ठेवायचा तरी कुणावर? काँग्रेसला सर्वात मोठं खिंडार… निवडून आलेले 12 नगरसेवक थेट भाजपात

अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नुकतेच निवडून आलेले 12 काँग्रेस नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत हा पक्षबदल काँग्रेससाठी मोठा राजकीय खिंडार ठरला आहे. यामुळे 'विश्वास ठेवायचा तरी कुणावर?' असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

विश्वास ठेवायचा तरी कुणावर? काँग्रेसला सर्वात मोठं खिंडार... निवडून आलेले 12 नगरसेवक थेट भाजपात
काँग्रेसला मोठं खिंडारImage Credit source: social media
| Updated on: Jan 08, 2026 | 2:13 PM
Share

राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीत जोर लावताना दिसत आहेत. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जीव ओतून काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी उलट्या सुलट्या आघाड्याही केल्या आहेत. तर काही ठिकाणी उमेदवारांची पळवापळवीही सुरू आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच अंबरनाथमध्ये मात्र काँग्रेसला (Congress)  मोठं खिंडार पडलं आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीत नुकतेच निवडून आलेले 12 नगरसेवक आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश करत आहेत. काँग्रेससाठी हा सर्वात मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.

दर्शना पाटील, अर्चना पाटील, हर्षदा पाटील, तेजस्विनी पाटील, प्रदीप पाटील, विपुल पाटील, कबीर गायकवाड, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजिवनी देवडे, दिनेश गायकवाड आणि किरण राठोड हे 12 नगरसेवक काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजप नेते तसेच मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. संजीव नाईक आणि दीपक म्हात्रे आदींचीही यावेळी उपस्थिती राहणार आहे.

काय घडलं होतं ?

अंबरनाथ शहरात अंबरनाथ विकास आघाडी स्थापन करण्यात आली होती. या आघाडीत भाजप, अजितदादा गट आणि काँग्रेस होती. त्यामुळे काँग्रेसची भाजपसोबत युती झाल्याची राज्यभर चर्चा सुरू होती. राष्ट्रीय पातळीवरही या चर्चेने लक्ष वेधलं होतं. त्याची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गंभीर दखल घेत या 12 नगरसेवकांवर कारवाई केली. त्यामुळे काँग्रेसचे अंबरनाथचे काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील नाराज झाले होते. त्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या आणि या 12 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या नगरसेवकांनी भाजपमध्ये जाणं हा काँग्रेससाठी धक्का मानलं जात आहे. निवडून आलेले नगरसेवक नितीमत्ता पाळत नाहीत. पक्षादेश मानत नाहीत. स्वत:च्या मनाने कारभार करतात. अशावेळी विश्वास ठेवायचा तरी कुणावर असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे.

भाजपसोबत जाणार नाही

दरम्यान, कालच हर्षवर्धन सपकाळ यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली होती. भाजपसोबत आमचा कोणताही संबंध नाही. निवडणूक लढवताना त्यांच्याशी कोणताही घरोबा केलेला नाही. आमच्या नगरसेवकांनी कुणालाही पाठिंबा दिला नाही. आमचा भाजपला पाठिंबा नाही. आम्ही भाजप सोबत जाणार नाही. काँगेसच्या तालुका अध्यक्षांना याबाबतचं स्पष्टकरणं मागितलं आहे, असं सपकाळ म्हणाले होते.

समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले.
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले.
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि....
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि.....
मुंबईकरांना काय हवं? यासाठी मुंबईत जन्म... राज यांचा फडणवीसांवर निशाणा
मुंबईकरांना काय हवं? यासाठी मुंबईत जन्म... राज यांचा फडणवीसांवर निशाणा.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं 'या' महिलांना भोवलं, कारण...
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं 'या' महिलांना भोवलं, कारण....
मी आमदार नाही, पण आमदाराचा बाप... दानवेंच्या विधानाची राज्यात चर्चा
मी आमदार नाही, पण आमदाराचा बाप... दानवेंच्या विधानाची राज्यात चर्चा.
VIDEO : ओवैसी-जलील यांच्या पदयात्रेत तुफान गर्दी, अख्खं संभाजीनगर जाम
VIDEO : ओवैसी-जलील यांच्या पदयात्रेत तुफान गर्दी, अख्खं संभाजीनगर जाम.
स्वत:चा महापौर बसवायला मुल्ला-सुल्ला चालतात? अविनाश जाधवांचा थेट सवाल
स्वत:चा महापौर बसवायला मुल्ला-सुल्ला चालतात? अविनाश जाधवांचा थेट सवाल.
गुरू तेग बहादुर यांचा अपमान? दिल्ली विधानसभेत गदारोळ अन् वातावरण तापलं
गुरू तेग बहादुर यांचा अपमान? दिल्ली विधानसभेत गदारोळ अन् वातावरण तापलं.