AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

bacchu kadu : प्रहारचा एल्गार; सरकारविरोधात चक्काजाम, बच्चू कडू आक्रमक भूमिकेनंतर धरपकड, राज्यात वातावरण तापलं

bacchu kadu big statements : उपोषणाचं आयुध वापरल्यानंतर आता बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. सरकारला आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी राज्यात चक्काजाम आंदोलन करणार आहे. तर प्रहार कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे. त्यामुळे वातावरण तापलं आहे.

bacchu kadu : प्रहारचा एल्गार; सरकारविरोधात चक्काजाम, बच्चू कडू आक्रमक भूमिकेनंतर धरपकड, राज्यात वातावरण तापलं
बच्चू कडूंचा एल्गार
| Updated on: Jul 24, 2025 | 8:44 AM
Share

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी आदींसाठी बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. प्रहार संघटना राज्यात चक्काजाम आंदोलन करणार आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मागणीसाठी बच्चू कडू यांनी विदर्भात पदयात्रा काढली. त्याचवेळी त्यांनी आंदोलनाची दिशा ठरवली. आता सरकारला आश्वासनांची आठवण करुन देण्यासाठी रस्त्यावरची लढाई सुरू होणार आहे.

शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी बच्चू कडू यांनी 8 जूनपासून आंदोलनाचे हत्यार उपासले होते. मोझरी येथील गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीसमोर त्यांचे हे उग्र उपोषण सुरू होते. सरकारच्या यशस्वी मध्यस्थीनंतर 6 दिवसांनी त्यांनी उपोषण मागे घेतले. मंत्री उदय सामंत यांनी मोझरीत येऊन सरकार बच्चू कडू यांच्या मागणीबाबत सकारात्मक असल्याची भूमिका त्यावेळी मांडली होती. त्यानंतर बच्चू कडू यांनी पश्चिम विदर्भातील जिल्ह्यातून सात बारा कोरा करण्यासाठी पदयात्रा काढली.

सरकारलाच वाटते महाराष्ट्र पेटत राहिला पाहिजे

महाराष्ट्रभरात सर्व ठिकाणी चक्काजाम आंदोलन होणार आहे. कर्जमाफीसाठी शेतकरी समोर येत आहे. मच्छीमार दिव्यांग मेंढपाळांचे प्रश्न आहे. सरकार कडूनच दिशाभूल करण्याच काम करत जात आहे. आमचं आंदोलन आता सरकारच्या हातात राहणार नाही. सरकारलाच महाराष्ट्रात अशांतता पाहिजे. सरकारलाच वाटते महाराष्ट्र पेटत राहिला पाहिजे. म्हणूनच कर्जमाफीची घोषणा करत नाही, असा घणाघात बच्चू कडू यांनी घातला.

त्यामुळे बच्चू कडू आता उग्र आंदोलन करणार अशी चर्चा होत आहे. प्रहार संघटनेला विरोधकांनी साथ दिल्यास राज्यात मोठे आंदोलन उभे ठाकण्याची शक्यता आंदोलक व्यक्त करत आहेत. पावसाचा बदलता पॅटर्न, सरकारची धोरण, कृषीमंत्री कायम वादात सापडत असल्याने प्रहारच्या आंदोलनाला धार येण्याची शक्यता आहे. सध्या शेतीची कामे सुरू असली तरी या आंदोलनाला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

सरकारचा दबावतंत्राचा वापर

काल प्रहारच्या दोनशे कार्यकर्त्याना नागपूर मध्ये अटक करून ठेवली आहे. आमच्यावर दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. ज्या ठिकाणी पोलीस अधीक्षक आंदोलन करू देणार नाही त्या ठिकाणी आम्ही पुन्हा चक्काजाम आंदोलन करू, असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला विविध संघटना, मनसेने पाठिंबा जाहीर केला आहे.

Follow Us
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी