AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : Amravati rain | अमरावतीत धो-धो बरसला, पावसात बाजार समितीतील शेतमाल भिजला, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

अमरावतीत आलेल्या धुव्वादार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत विकायला आणलेला हजारो क्विंटल शेतमाल पावसाने भिजला. मुसळधार पावसामुळे शेतमाल पाण्याने वाहत गेला. पेरणीचे दिवस असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतमाल आणतात. बाजार समितीकडून उपाय योजना होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

Video : Amravati rain | अमरावतीत धो-धो बरसला, पावसात बाजार समितीतील शेतमाल भिजला, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
पावसात बाजार समितीतील शेतमाल भिजला
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jun 18, 2022 | 5:11 PM
Share

अमरावती : विदर्भात मान्सून कोसळतोय. अमरावतीतही आज मान्सून कोसळला. अमरावतीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान (Loss) झालंय. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत (Agricultural Produce Market Committee) विकायला आणलेला शेतमाल पावसात भिजला. त्यामुळं शेतकऱ्यांचं हजारो रुपयांचं नुकसान झाले. पेरणीचे (Sowing) दिवस असल्यानं मोठ्या प्रमाणावर शेतकरी शेतमाल बाजार समितीमध्ये आणत आहेत. मात्र, बाजार समितीकडून शेतमाल ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.

15 ते 20 मिनिटं मुसळधार

15 ते 20 मिनिटं मुसळधार पाऊस झाला. यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. यापूर्वी आलेल्या पावसात धान्य भिजलं. आज पुन्हा पाऊस गेल्यानं शेतमालाचं नुकसान झाल्याचं एका शेतकऱ्यानं सांगितलं. बऱ्याच शेतकऱ्यांचं या पावसात नुकसान झालंय. राजकारण्यांनी निवडणुकीत व्यस्त राहण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं लक्ष द्यावं. शेतकऱ्यांचं कष्ट शेतकऱ्यांनाच माहिती आहेत, अशी टीका एका शेतकऱ्यानं केली.

पाहा व्हिडीओ

हजारो क्विंटल शेतमाल भिजला

अमरावतीत आलेल्या धुव्वादार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत विकायला आणलेला हजारो क्विंटल शेतमाल पावसाने भिजला. मुसळधार पावसामुळे शेतमाल पाण्याने वाहत गेला. पेरणीचे दिवस असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर आणतात शेतमाल. बाजार समितीकडून उपाय योजना होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. पावसामुळं शेतकरी कामाला लागला आहे. शेतमाल विकून दोन पैसे हातात येतील. शेतातली कामं सुरू करता येतील, अशी शेतकऱ्यांना आस होती. त्यासाठी त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल आणून ठेवला. पण, त्याठिकाणी शेतमाल ठेवण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळं शेतमाल भिजला. यात नुकसान शेतकऱ्यांचंच झालं.

शिरजगावात वाहू लागले रस्त्यावरून पाणी

अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथे ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. गावातील रस्त्यांवरुन पाणी वाहून गेले. रस्त्यालगतच्या अनेक घरांत पाणी घुसले. पाण्यातून दुचाकी वाहत चालविताना नागरिकांची चांगलीच दमछाक झाली. अचानक आलेल्या पावसाने मोठे नुकसान झाले. अमरावती जिल्ह्यात पावसाची दमदार एंट्री झाली.

Follow Us
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!