AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायला आम्हाला कुणाच्या परवानगीची गरज नाही’

जे शिवभक्त परवानगी मागून थकले त्यांना परवानगी मिळाली नाही, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी कुणाच्या परवानगी कशाला हवी? असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे.

'छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायला आम्हाला कुणाच्या परवानगीची गरज नाही'
अमरावतीत राडा
| Edited By: | Updated on: Jan 16, 2022 | 3:28 PM
Share

अमरावतीत सकाळपासून राजकारण जोरदार तापलंय. खासदार नवनीत राणा (Navneet rana) आणि आमदार रवी राणा (Ravi rana) आपल्या आक्रमक अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असतात. पण आज जोडपं पुन्हा चर्चेत आलंय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून. छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji mahraj) पुतळा बसवण्यासाठी आम्हाला कुणाच्या परवानगीची गरज नाही, असे वक्तव्य खासदार नवनीत राणा यांनी केले आहे. राणा यानी बसवलेला पुतळा हाटवल्यानंतर अमरावतीत जोरदार राडा सुरू झाला. नवनीत राणांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यावेळी सरकारविरोधात कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करताना दिसून आले. विनापरवनागी राणा यांनी पुतळा बसवला होता, तो मोठ्या पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आला.

नवनीत राणा काय म्हणाल्या?

जे शिवभक्त परवानगी मागून थकले त्यांना परवानगी मिळाली नाही, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी कुणाच्या परवानगी कशाला हवी? असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे अमरावती शहरात तणावाचे वातावरण दिसून आले. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी तीन वर्षे परवानगी न मिळाल्याने आम्ही पुतळा बसवला. ज्या उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मतदान मागतात, ते छत्रपती शिवाजी महाजांचे पुतळे हटवता. अशी टीका त्यांनी केली आहे. ज्या महाराजांच्या मुळे महाराष्ट्र घडला, मात्र आता कुठे बाळासाहेब ठाकरेंचे आदर्श, कुठे गेले बाळासाहेब ठाकरेंचे विचार? कुठे चाललाय माझा महाराष्ट्र म्हणत नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार घोषाबाजी

अमरावतीत आज फक्त उद्धव ठाकरे मुर्दाबादच्या घोषणा घुमत होत्या. नवनीत राणा यांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमल्यानंतर कार्यकर्त्यांनी आणि नवनीत राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांना टार्गेट करत, उद्धव ठाकरे मुर्दाबादच्या घोषणा सुरू केल्या. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यावे लागली. मात्र पोलिसांच्या गाडीत चढतानाही कार्यकर्त्यांच्या मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणा थांबल्या नाहीत. अमरावतीतला हा हायव्होल्टेज ड्रामा सध्या राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेत आहे.

Ravi Rana | ‘ही शिवसेना नव्हे, ही तर काँग्रेस सेना’ शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरुन राजकारण तापलं!

दुगाण्या झाडायला काय अक्कल लागते?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टोलेबाजी सुरूच

UP Election: युपीच्या राजकारणात बिकनीची चर्चा, करिअरचा राजकारणाशी संबंध जोडू नका

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.