AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामदास कदम कोणत्या बाकड्यावर झोपले, तो बाकडा मी शोधतोय; अनिल परब यांचा कदम यांना टोला

रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणात दिवंगत नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी धक्कादायक दावे केले होते. याला आता अनिल परब यांनी उत्तर दिले आहे.

रामदास कदम कोणत्या बाकड्यावर झोपले, तो बाकडा मी शोधतोय; अनिल परब यांचा कदम यांना टोला
Parab and Kadam
| Updated on: Oct 04, 2025 | 3:22 PM
Share

शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणात दिवंगत नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी धक्कादायक दावे केले होते. ‘शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले? आणि त्यांचा मृतदेह मातोश्रीवर किती दिवस ठेवण्यात आला होता, याची माहिती काढावी अशी माझी एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती आहे. मी त्या काळात आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलेलो आहे. मला सगळं कळत होतं. पण हे सारं कशासाठी करण्यात आलं. मला कोणीतरी सांगितलं की माँसाहेबांच्या हातांचे ठसे घेण्यात आले होते. मग हे ठसे कशासाठी घेण्यात आले होते. नेमकं काय होतं?’ असे सवाल कदम यांनी उपस्थित केले होते. यावर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी उत्तर दिले आहे.

रामदास कदम कोणत्या बाकड्यावर झोपले होते?

रामदास कदम यांच्या आरोपांना उत्तर देताना अनिल परब म्हणाले की, ‘बाळासाहेबांच्या अंतिम क्षणी मी 24 तास तिकडे होतो. प्रत्येक क्षणाला मी जी घटना पाहिली, घडलेली आहे, त्याचा मी साक्षीदार आहे. 2012 ला रामदास कदम कोणत्या बाकड्यावर झोपले होते, हा बाकडा मी शोधतोय. मातोश्रीवर असं कुणाला कोणत्या बाकड्यावर झोपायला देत नाही. बाळासाहेब ज्या खोलीत होते. तिथे 24 तास डॉक्टरांचं पथक होतं. एक डॉक्टर नव्हता. पथक होतं. असंख्य लोकं तिथे भेटायला येत होते.’

रामदास कदमांवर अब्रू नुकसानीचा दावा करणार

पुढे बोलताना परब म्हणाले की, ‘बाळासाहेब जिवंत आहेत हे सर्वांना माहीत होतं. त्यांची प्रकृती खालावली होती हे सर्वांना माहीत होतं. पण त्याचं राजकारण केलं जात आहे. महाराष्ट्रात जे प्रश्न उभे राहिले आहेत त्यापासून लक्ष बाजूला न्यायचा हा या मागचा कुटिल डाव आहे. रामदास कदम म्हणतात नार्को टेस्ट करा. आमचं म्हणणं असं आहे की नार्को टेस्ट झाली पाहिजे. सत्य बाहेर आलं पाहिजे. मी कदमवर अब्रू नुकसानीचा दावा करत आहे. जी रक्कम येईल ही रक्कम दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना पाठवली जाईल. ही नार्को टेस्ट होण्याची गरज आहे.’

उद्धव ठाकरेंनी दिलेलं मंत्रिपद का स्वीकारलं?

रामदास कदम यांच्यावर बोलताना परब म्हणाले की, ‘रामदास कदम यांना बाळासाहेब गेल्यावर त्यांना 14-15 वर्षानंतर कंठ फुटला. बाळासाहेब 2012 ला गेले. 2014 ला रामदास कदम मंत्री झाले. त्यांना मंत्री केलं कोणी उद्धव ठाकरे यांनी. तेव्हा बाळासाहेब नव्हते. उद्धव ठाकरे इतके वाईट होते तर 2014 ला रामदास कदम यांनी मंत्रिपद का स्वीकारलं? 2014 ते 2019 मंत्रिपद ओरपलं. 2019 ला मुलाला आमदारकी घेतली. म्हणजे शिवसेनेकडून जोपर्यंत सर्व मिळत होतं. उद्धव ठाकरेंकडून मिळत होतं तोपर्यंत उद्धव ठाकरे चांगले होते. उद्धव ठाकरेंनी वाईट केलं असतं तर तुम्ही मराठा स्वाभिमानी समजता तुम्ही त्याचवेळी पक्ष सोडायला हवा होता. मी अशा माणसासोबत मी काम करणार नाही, असं सांगायला हवं होतं.’

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...