AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तोक्ते चक्रवीदाळात बार्ज बुडाली, 10 दहा तास डोंगराएवढया लाटांशी संघर्ष , साताऱ्याच्या अनिलची झुंज यशस्वी

बार्जतून उडी मारुन लाईफ जॅकेटच्या सहाय्यानं 10 तास झुंज सातारच्या अनिल वायचळ यांनी दिली. Anil Waychal Barge P

तोक्ते चक्रवीदाळात बार्ज बुडाली, 10 दहा तास डोंगराएवढया लाटांशी संघर्ष , साताऱ्याच्या अनिलची झुंज यशस्वी
अनिल वायचळ
| Updated on: May 20, 2021 | 7:17 PM
Share

सातारा: तौक्ते चक्रीवादळात समुद्रात बुडालेल्या बार्जतून उडी मारुन लाईफ जॅकेटच्या सहाय्यानं 10 तास झुंज सातारच्या अनिल वायचळ यांनी दिली. दुर्घटनाग्रस्त बार्जमधून वाचलेल्या सातारच्या शेरदिल सुपुत्र अनिल वायचळ यांचे मुंबई येथील घरात औक्षण करुन स्वागत करण्यात आलं. (Anil Waychal a youth form Satara was rescued by Indian Navy who work on Barge P 305 drown during Tauktae Cyclone welcome by family members)

डोंगराएवढ्या लांटाशी यशस्वी झुंज

तौक्ते चक्री वादळामुळे खवळलेल्या समुद्रात बार्ज बुडाल्याने अनिल वायचळ यांनी पाण्यात उडी घेतली. अनिल निवृत्ती वायचळ यांनी डोंगराएवढ्या लाटांशी धाडसाने दिलेली झुंज अखेर यशस्वी ठरली.लाईफ जॅकेटच्या सहाय्यानं तब्बल नऊ तास समुद्रात तरंगत पडलेल्या वांग खोऱ्याच्या मातीतला या शेरदील सुपुत्राची नौदलाच्या पथकाने सुखरूप सुटका केली. गेले तीन दिवस डोळ्यात प्राण आणून त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या त्यांच्या कुटुंबीय शेजारी व नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला. अनिल वायचळ यांचे घणसोली नवी मुंबई येथील घरात औक्षण करुन त्यांचे स्वागत करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कुंभारगावच्या वायचळवाडी हे अनिल वायचळ यांचं मूळगाव आहे.

17 तारखेनंतर संपर्क तुटला

अनिल वायचळ हे मुंबईत अँफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीत कार्यरत आहेत.अरबी समुद्रातील ओएनजीसीच्या प्लॅन्टवर या कंपनीचे काम सुरू असल्याने वादळावेळी सहकाऱ्यांसमवेत ते तिकडे ड्युटीवर कार्यरत होते.त्या सर्वांना चक्रीवादळाबाबत संदेश प्राप्त झाला होता. मात्र, ते ज्यावर थांबलेले होते ते बार्ज मजबूत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाईल, असे त्यांना वाटत नव्हते. सोमवारी (17 मे) त्यांनी मोबाईलवरून घरच्यांना मेसेज केला आणि त्यानंतर त्यांचा संपर्कच तुटला.

10 तास पाण्यावर तरंगत राहिले

वादळामुळे समुद्र खवळल्याने उंचच उंच लाटा उसळू लागल्या. अनिल व त्यांचे सहकारी थांबलेल्या बार्जमध्ये पाणी घुसल्याने पाचच्या सुमारास त्यांना लाईफ जॅकेटसह पाण्यात उड्या घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्या घेताना काही जण अडकून भरकटले, तर काही एकमेकांचे हात पकडून पाण्यावर तरंगत राहिले. दहा तास त्यांची जणू जगण्या मरण्याची लढाईच लढली. रात्री अडीच वाजता नौदलाचे बचाव पथक पोचल्यावर त्यांना बोटीवर घेऊन नंतर किनाऱ्यावर आणण्यात आले. बुधवारी सायंकाळी सहा वाजता ते घणसोली मुंबई येथील घरी परतल्यावर त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या कुटुंबीय व नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला. या वेळी सर्वांचेच डोळे आनंदाश्रूनी डबडबले होते.

संबंधित बातम्या:

Remedesivir : कोरोना रुग्णावरील उपचारासाठी आता रेमडेसिव्हीर वापरलं जाणार नाही – WHO

‘विद्यार्थ्यांचं भविष्य आणि करिअर आपण अशाप्रकारे खराब करु शकत नाही’, परीक्षा रद्दच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाची नाराजी

(Anil Waychal a youth form Satara was rescued by Indian Navy who work on Barge P 305 drown during Tauktae Cyclone welcome by family members)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.