AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | 23 मे रोजी औरंगाबादेत भाजपाचा पाण्यासाठी आक्रोश मोर्चा, 25 हजार महिला हंडे घेऊन महापालिकेवर धडकणार

50 टक्के कपात करण्यात आली. मात्र आतापर्यंत वसूल केलेली पाणीपट्टीही परत करा, अशी मागणी भाजपने केली आहे. या सर्व मागण्यांसाठी 23 मे रोजी दुपारी चार वाजता भाजप विराट मोर्चा काढणार असल्याचं कराड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

Aurangabad | 23 मे रोजी औरंगाबादेत भाजपाचा पाण्यासाठी आक्रोश मोर्चा, 25 हजार महिला हंडे घेऊन महापालिकेवर धडकणार
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: May 16, 2022 | 1:48 PM
Share

औरंगाबादः मे महिन्याचा वाढलेला पारा आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचा उसळलेला जनक्षोभ, याच पार्श्वभूमीवर भाजपतर्फे (BJP) पाणी समस्येवर मोठं आंदोलन करण्यात येत आहे. येत्या 23 मे भाजप मोठा जल आक्रोश मोर्चा शहरातून काढणार आहे. नागरिकांनाशहरातील  विशेषतः महिलांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि भाजप नेते डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाविषयी माहिती दिली. रिकामे हंडे घेऊन महिला आणि शहरातील नागरिकांचा हा मोर्चा महापालिका आयुक्तालयावर धडकणार आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे पाणी प्रश्नावरील औरंगाबादमधील हा विराट मोर्चा असेल, असं म्हटलं जात आहे.

पाणीपट्टी कपात, पण प्रश्न कायम

शहरातील विविध भागांमध्ये आठ ते नऊ दिवसांनी पाणी येते. वाढता उन्हाचा पारा पाहता हा पुरवठा अपुरा होतो. त्यातही लोडशेडिंग आणि अन्य कारणामुळे अत्यंत तुटपुंजा पुरवठा होतो. त्यामुळे गेल्या अनेक आंदोलनांद्वारे औरंगाबादकर नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. वाढता जनक्षोभ लक्षात घेता पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पाणीपट्टी निम्म्यानी कमी केली. मात्र यामुळे पाण्याचा प्रश्न काही सुटलेला नाही, अशीच जनभावना व्यक्त होत आहे. राज्यात सर्वाधिक 4050 पाणीपट्टी औरंगाबादची होती. यात 50 टक्के कपात करण्यात आली. मात्र आतापर्यंत वसूल केलेली पाणीपट्टीही परत करा, अशी मागणी भाजपने केली आहे. या सर्व मागण्यांसाठी 23 मे रोजी दुपारी चार वाजता भाजप विराट मोर्चा काढणार असल्याचं कराड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

मनसेची पाणीसंघर्ष यात्रा

पाणी प्रश्नावर वातावरण तापलं असताना मनसेनंही सध्या शहरातील वॉर्डा-वॉर्डातून संघर्ष यात्र काढली आहे. 25 वर्षांपासूनच्या पाणी समस्येवर नागरिकांकडून 25 हजार पत्रे लिहून घेतली जात असून ही पत्रे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवली जाणार आहेत.

MIM ची काय मागणी?

दरम्यान, मनपाने औरंगाबाद शहरातील नागरीकांना पाणी पुरवठा न करता आजपर्यंत वसुल केलेली कोट्यावधीची पाणी पट्टीची रक्कम व्याजासह परत करुन सद्यस्थितीत नागरीकांकडे थकीत असलेली पाणी पट्टी पूर्णपणे माफ करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग