AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद पाणीप्रश्नावर आता मुख्यमंत्र्यांचा वॉच, दर 15 दिवसाला आढावा घेणार, मुंबईत महत्त्वाची बैठक!

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचा पाणी प्रश्न शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही गांभीर्याने घेतला आहे.

औरंगाबाद पाणीप्रश्नावर आता मुख्यमंत्र्यांचा वॉच, दर 15 दिवसाला आढावा घेणार, मुंबईत महत्त्वाची बैठक!
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jun 17, 2022 | 4:16 PM
Share

औरंगाबादः औरंबादच्या पाणी पुरवठा योजनेची गती वाढवण्याच्या सूचना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिल्या आहेत. ठाकरे यांनी आज औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर महत्त्वाची बैठक घेतली. शहरात सुरु असलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेच्या (water supply scheme) कामाचा सविस्तर आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. तसेच इथून शहरातील पाणीपुरवठा योजनेवर थेट मुंबईतून वॉच असेल. दर 15 दिवसांनी मुख्यमंत्र्यांकडून या योजनेचा आढावा घेतला जाईल. एकूणच, आगामी महापालिका निवडणुकांच्या (Municipal corporation) पार्श्वभूमीवर शहरातील भाजप, मनसे आणि इतर विरोधकांनी उचलून धरलेल्या पाणी प्रश्नावर शिवसेनेनं अधिक गांभीर्यानं पावलं उचलायला सुरुवात केलेली दिसतेय. भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली येथे मोठा जलाक्रोश मोर्चा काढला. मनसेनंही पाणी संघर्ष यात्रा आयोजित केली होती. शहरातील पाणी प्रश्नावर मोठं राजकीय नाट्य रंगलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा विषय अधिक सविस्तरपणे हाताळणार असल्याचे संकेत दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?

औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण तसेच पालकमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. यावेळी महापालिका प्रशासकांनी शहरातील नव्या पाणीपुरवठा योजनेचं काम कुठवर आलंय, याचा अहवाल सादर केला. मुख्यमंत्र्यांनीही अत्यंत बारकाईने याचा अभ्यास केला. तसेच यापुढे पाणीपुरवठा योजनेची गती वाढवण्याचेही आदेश दिले.

  • शहरातील नव्या पाणीपुरवठा योजनेची कामं वेगाने करावीत.
  • दर 15 दिवसाला मुख्यमंत्री घेणार पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला जाईल.
  •  पाणीपुरवठा योजनेची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे औरंगाबादेत येऊन करणार पाहणी
  • अंतर्गत पाणीपुरवठा वाढवण्याचं कामही लवकरात लवकर हाती घ्यावं..

भाजपच्या हातचा मुद्दा निसटणार?

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने शहरातील पाणी प्रश्न चांगलाच उचलून धरला आहे. शहरात सर्वाधिक पाणी पट्टी वसूल केली जात असूनही नागरिकांना अनेक आठ ते दहा दिवसाच्या अंतराने पाणी येतं. अनेकदा पाणी येण्याचा दिवस असताना वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना पाणी भरता येत नाही. वेळापत्रक कोलमडतं. शहरातील जुनी पाणीपुरवठा योजना जीर्ण झाल्यामुळे अनेकदा त्यात बिघाड होतो. पाईपलाइन फुटते. तिची डागडुजी करेपर्यंत पाण्यात व्यत्यय येतो. या सर्व समस्यांना नागरिक कंटाळले. त्यामुळे भाजपने हाच मुद्दा उचलून धरत शहरात मोठा जलाक्रोश मोर्चा काढला. मात्र त्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनं पाणी प्रश्वावर उपाययोजना सुरु केल्या. शहरातील पाणी उपसा वाढवून जास्तीत जास्त पाणीपुरवठा कसा केला जाईल, यासंबंधी उपाययोजना राबवल्या जात आहेत. पालकमंत्र्यांनी आदेश काढत, नवी पाणीपुरवठा योजना होईपर्यंत पाणीपट्टी निम्मीच भरावी, अशा सूचना केल्या. तसेच अत्यंत संथ गतीने सुरु असलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेचा आढावा खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेवर आरोप करण्यासाठी भाजपच्या हातून एक मुद्दा निसटणार की काय, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Follow Us
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...