AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | आरोग्यमंत्री राजेश टोपेंची अपघात ग्रस्ताला मदत, आपल्या ताफ्यातील वाहनातून रुग्णालयात पोहोचवलं…

राजेश टोपेंनी गाडीचा ताफा थांबवला. त्यांच्यासोबत पोलीस सुरक्षा रक्षकांचंही वाहन होतं. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमी तरुणाला तातडीने टोपेंनी मदत केली.

Aurangabad | आरोग्यमंत्री राजेश टोपेंची अपघात ग्रस्ताला मदत, आपल्या ताफ्यातील वाहनातून रुग्णालयात पोहोचवलं...
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 16, 2022 | 1:00 PM
Share

औरंगाबादः एरवी राजकीय आरोप प्रत्यारोप करताना मागपुढे न बघणारे नेते..वेळ येते तेव्हा माणुसकीचं दर्शन घडवतात. अर्थात जालन्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) हे अत्यंत संयमी आणि शांत वृत्तीचे राजकारणी (Political Leaders) असून त्यांची वाणी देखील संयमित असते. याच टोपेंचं आणखी एक संवेदनशील रुप काल दिसून आलं. औरंगाबादमध्ये रात्रीच्या वेळी निवानस्थानी परतत असताना राजेश टोपेंनी एका दुचाकी स्वाराला अपघात (Road Accident) ग्रस्त अवस्थेत पाहिलं. एखादी मोठ्या पदावर असेलली व्यक्ती अशा वेळी रस्त्यावरून तशीच घरी निघून गेली असती. पण राजेश टोपे यांनी गाडीतून उतरून स्वतः ती घटना काय झाली आहे, हे पाहिलं आणि तरुणाची योग्य मदतही केली.

काय दिसतंय व्हिडिओत?

रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आपल्या वाहनातून रात्री 12 वाजता निवासस्थानी परतत होते. यावेळी त्यांनी एक दुचाकीस्वार अपघातग्रस्त अवस्थेत पाहिला. टोपेंनी गाडीचा ताफा थांबवला. त्यांच्यासोबत पोलीस सुरक्षा रक्षकांचंही वाहन होतं. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमी तरुणाला तातडीने टोपेंनी मदत केली. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या तरुणाला तत्काळ वाहनात बसवण्याच्या सूचना टोपेंनी दिल्या. तरुणाला उचलण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत टोपेंनीही मदत केली. नंतर पोलिसांच्या वाहनात त्याला बसवण्यात आलं. यावेळी तू टोपेंनी गाडीचा ताफा थांबवला. त्यांच्यासोबत पोलीस सुरक्षा रक्षकांचंही वाहन होतं. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमी तरुणाला तातडीने टोपेंनी मदत केली.वेक उत्तम भडके या तरुणांचं निधन झालं.

हिंगोलीत अपघात, दोन ठार

हिंगोली ते नरसी नामदेव मार्गावर राहोली पाटीजवळ काल अपघात घडला. भरधाव कार आणि दुचाकीची धडक होऊन ही गंभीर घटना घडली. या अपघातात दोन तरुण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमी रुग्णावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. रविवारी साडे सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात ज्ञानेश्वर गजानन वाघमारे, विवेक उत्तम भडके या तरुणांचं निधन झालं

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.