AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | ‘गरीबांचं नंतर पाहू, आधी आमदारांना घर देऊ’, कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

कन्नडचे शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने शहरात बॅनरबाजी केली आहे. मला मुंबईत घर द्या हो... अशी व्याकुळ मागणी आमदारांची असून त्यांच्यासाठी भिक मागो आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

Aurangabad | 'गरीबांचं नंतर पाहू, आधी आमदारांना घर देऊ', कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
कन्नड शहरात राष्ट्रवादीकडून बॅनरबाजीImage Credit source: TV9 Marathi
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 26, 2022 | 10:59 AM
Share

औरंगाबादः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नुकतीच आमदारांना घरे बांधून देण्याची घोषणा केल्याने राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीच्या या निर्णयाविरोधात कन्नडमधील राष्ट्रवादी काँग्रेसनेच आंदोलनाचा इशारा दिला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (National congress Party) कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आहेत. कन्नडच्या आमदारांना मुंबईत घर देण्यासाठी भीक मागो आंदोलन (Agitation) करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. गरीबांना घरकुल मिळो अथवा न मिळो, पण आमदारांना घर मिळण्यासाठी भीकही मागायची तयारी आहे, असा उपहासात्मक अर्थाचा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाविरोधात सोमवारी आंदोलन करणार असल्याचा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.

शिवसेना आमदाराविरोधात आंदोलन

कन्नडचे शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने शहरात बॅनरबाजी केली आहे. मला मुंबईत घर द्या हो… अशी व्याकुळ मागणी आमदारांची असून त्यांच्यासाठी भिक मागो आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. येत्या सोमवारी आमदारांची मागणी पूर्ण करण्यासाठी अधिकारी, गुत्तेदार व तालुक्यातील अवैध धंदेवाले यांच्याकडे आंदोलन करणार असल्याचा इशारा या बॅनरवर देण्यात आला आहे. कन्नड शहरातील प्रमुख चौकात तसेच प्रमुख रस्त्यांवर हे बॅनर लावण्यात आले आहे.

आमदारांच्या घरावरून ठाकरे सरकार चौफेर टीका

राज्यातील सर्वपक्षीय आमदारांना म्हाडाची 300 घरे देण्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी विधानसभेत केली. त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटत आहेत. कोट्यवधींची मालमत्ता असणाऱ्या आणि लाखोंचा पगार असलेल्या आमदारांना घर कशासाठी, असा सवाल सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. दरम्यान, आमदारांना ही घरे मोफत देण्यात येमार नसून कम किंमतीत दिली जातील, आमदारांकडून घराची किंमत वसूल केली जाईल नंतरच घराचा ताबा दिला जाईल, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. मात्र आमदारांच्या घरांवरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही आमदारांनी याचे स्वागत केले तर काहींनी आम्हाला घर देण्यापेक्षा शेतकऱ्यांना मोफत वीज द्या, असं म्हटलं आहे.

इतर बातम्या-

वाहनचालकांनो, चुका कराल तर insuranceचा छदामही मिळणार नाही, वाचा काय करावं आणि काय करू नये

Akola | वंचितवर आरोप करणाऱ्या संतोष बांगरांना प्रत्युत्तर, Rajendra Patode म्हणतात, एक हजार कोटींचे आरोप बालीशपणाचे

Follow Us
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी