AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | ‘संभाजीनगर’ची घाई झालेल्या गूगलविरोधात तक्रार करणार, औरंगाबादेत नामांतरविरोधी संघर्ष समिती आक्रमक, पुढचे पाऊल काय?

गूगलने कोणत्या अधिकारातून हे  बदल केलाय, असा सवाल खा. जलील यांनी ट्विटरद्वारे केला आहे. 

Aurangabad | 'संभाजीनगर'ची घाई झालेल्या गूगलविरोधात तक्रार करणार, औरंगाबादेत नामांतरविरोधी संघर्ष समिती आक्रमक, पुढचे पाऊल काय?
| Edited By: | Updated on: Jul 21, 2022 | 1:05 PM
Share

औरंगाबादः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सरकारने औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर (sambhajinagar) करण्याचा निर्णय घेतलाआहे. मात्र अद्याप केंद्र सरकारकडून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली नाही. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात औरंगाबादेत नामांतर विरोधी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. नामांतराची ही लढाई आता कोर्टात लढण्याची समितीची तयारी असतानाच आणखी एक अजब प्रकार समोर आला. गूगल (Google) वेब पोर्टलवर औरंगाबाद शहराचे नाम बदलून संभाजीनगर करण्यात आले आहे. केंद्र सरकारने अद्याप मंजुरी दिलेली नसताना गुगलने परस्पर हे बदल केल्याने नामातंरविरोधी समितीतील सदस्यांचा संताप झाला आहे. दोन दिवसांपासून सोशल मीडियावरही एसटी महामंडळाच्या बसेसवर नामांतराचे फलक फिरत आहेत. औरंगाबादच्या नामांतरावरून राजकीय पक्षही श्रेयवादाचे राजकारण करत आहेत. मात्र नामांतरालाच आक्षेप घेणाऱ्या समितीने आता अधिक आक्रमक होण्याचे ठरवले आहे. गूगलविरोधात कायदेशीर कार्यवाही करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

नामांतरविरोधी केंद्रीय संघर्ष समितीची स्थापना

औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याच्या निर्णयाविरोधात केंद्रीय संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची कार्यकारिणी घोषित झाली आहे. समितीच्या अध्यक्षपदी खालेद अहमद, उपाध्यक्ष सय्यद रफिक अहमद, उपाध्यक्ष अय्युब खान, सचिव अबुबकर रेहबर, सहसचिव डॉ. सोगेल झकिउद्दीन, कोषाध्यक्ष हसन पटेल यांची निवड करण्यात आली. सदस्यपदी हिशाम उस्मानी, अय्युब जहागीरदार, इलियास किरमाणी, जमीर अहमद कादरी, नईम खान, शेक जलील, अब्दुल मोहिद हशर, शफिक अहमद, आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.

समितीचे आदेश काय?

औरंगाबादचे नामांतर करण्याविरोधी ही समिती योग्य पाऊले उचलत असून सर्व नामांतर विरोधी नेत्यांनी या समितीत शामिल व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या समितीने 1996 मध्ये न्यायालयीन लढाई लढली होती. अॅड. एम. ए. लतीफ यांनी सर्वोच्च न्यायालयात यासंबंधीची याचिका दाखल केली होती. समितीने सर्वोच्च न्यायालयातून नामांतरावर स्टे ऑर्डर आणली होती. अॅड. कमरुद्दीन व कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात हा खटला चालवला होता. या समितीच्या समन्वयाशिवाय कुणीही न्यायालयात जाऊ नये, अशी विनंती समितीने केली आहे. सध्या तरी गूगलविरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी समितीने पुढची पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

खा. इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया काय?

गूगल पोर्टलवर औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची खोडसाळ कृती नेमकी कुणी केली आहे, याचा शोध घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे खा. इम्तियाज जलील यांनी दिली आहे. गूगलने कोणत्या अधिकारातून हे  बदल केलाय, असा सवाल खा. जलील यांनी ट्विटरद्वारे केला आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.