AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Alert | मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट, पारा 44 अंशावर जाण्याची शक्यता, घराबाहेर पडणे टाळा!

औरंगाबादः राजस्थान आणि गुजरातसह वायव्येकडून येणारे शुष्क उष्ण वारे (Heat wave) महाराष्ट्रात धडकले असून येत्या काही दिवसात याचे तीव्र परिणाम पहायला मिळतील, असा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवला आहे. महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भातील काही भागांना या उष्णतेच्या लाटेचा जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यातच औरंगाबादचा पारा चाळीसपर्यंत पोहोचला होता. यासह मराठवाड्यातील […]

Weather Alert |   मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट, पारा 44 अंशावर जाण्याची शक्यता, घराबाहेर पडणे टाळा!
महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट, आरोग्याची काळजी घेण्याची गरज.Image Credit source: TV9
| Updated on: Mar 29, 2022 | 11:17 AM
Share

औरंगाबादः राजस्थान आणि गुजरातसह वायव्येकडून येणारे शुष्क उष्ण वारे (Heat wave) महाराष्ट्रात धडकले असून येत्या काही दिवसात याचे तीव्र परिणाम पहायला मिळतील, असा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवला आहे. महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भातील काही भागांना या उष्णतेच्या लाटेचा जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यातच औरंगाबादचा पारा चाळीसपर्यंत पोहोचला होता. यासह मराठवाड्यातील परभणी, नांदेड, लातूरचंही तापमान चाळीशीपर्यंत पोहोचलं होतं. त्यानंतर 21 मार्चपासून तापमानात काही प्रमाणात घट झाली होती. आठवडाभर ढगाळ वातावरणाचा अनुभव घेतल्यानंतर मार्च अखेर पुन्हा एकदा तापमानात वाढ होत आहे. तसेच येत्या चार दिवसात राज्यातील तापमानात आणखी दोन ते तीन अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे.

पारा 44 अंशांवर पोहोचण्याची शक्यता

आज मंगळवारपासूवन पुढील चार दिवस राज्यावर उष्णतेच्या लाटेचं सावट असून मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचे तापमान 44 अंशांवर पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे बहुतांशी नागरिकांनी थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळावे, असे निर्देश विभागातर्फे देण्यात आले आहे.

अतिनील किरणांमुळे उष्माघाताची शक्यता

राज्यातील तापमान सतत वाढत असल्याने सूर्याचा यूव्ही इंडेक्स 11 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 28 मार्च रोजी तो महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये 9 ते 10 या उच्च पातळीवर होता. येत्या चार दिवसात हा इंडेक्स धोक्याच्या पातळीवर राहण्याची शक्यता आहे. ही श्रेणी मानवी शरीरासाठी अतिशय धोकादायक असून अतिनील किरणे थेट शरीरावर पडल्यास त्वचा जळणे, डोळ्यांचे विकार, मोतीबिंदू, त्वचेचा कर्करोग, उष्माघातासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

हवामान शास्त्रज्ञ के. एस. होसळीकर यांचे ट्वीट

मार्च महिन्यात दुसरी उष्णतेची लाट

यंदा मार्च महिन्यात म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट आली होती. 17 ते 19 मार्च दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट धडकली होती. 29 मार्च ते 1 एप्रिलदरम्यान दुसरी उष्णतेची लाट येणार आहे.पुढील चार दिवस याचे परिणाम जाणवतील.  या लाटेचा सर्वाधिक प्रभाव विदर्भ आणि मराठवाड्यात जाणवेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात 28 मार्च रोजी अकोला शहराचे तापमान 42.3 अंश सेल्सियस होते. पुढील चार दिवसात ते 44 अंशांवर जाण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या-

Mumbai : नोकरभरतीत लिंगश्रेणीचा पर्याय उपलब्ध करण्याची मागणी, कोर्टाची राज्य सरकार नोटीस

Video : जगातला सर्वात महागडा उंट, किंमत माहीत आहे का? सौदी अरेबियात नुकताच झालाय लिलाव; वाचा सविस्तर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.