AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ZP Election: जिल्हा परिषद फेररचना आराखडा जानेवारीत सादर होणार, औरंगाबाद, सिल्लोडमध्ये दोन गट वाढणार

औरंगाबाद जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या गणांची फेररचना करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आले आहे. हा आराखडा तयार करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात फेर रचनेचा आराखडा शासनाला सादर केला जाणार आहे.

ZP Election: जिल्हा परिषद फेररचना आराखडा जानेवारीत सादर होणार, औरंगाबाद, सिल्लोडमध्ये दोन गट वाढणार
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 3:33 PM
Share

औरंगाबादः महापालिका आणि नगरपालिकेच्या धर्तीवर वाढीव लोकसंख्येनुसार जिल्हा परिषदेच्याही गट आणि गणांची संख्या वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या गणांची फेररचना करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आले आहे. हा आराखडा तयार करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात फेर रचनेचा आराखडा शासनाला सादर केला जाणार आहे. नव्या रचनेनुसार, औरंगाबाद, सिल्लोडमध्ये प्रत्येक 2 तर फुलंब्री, पैठण, वैजापूरमध्ये प्रत्येकी 1 गट तसेच कन्नडमध्ये किंवा खुलताबाद तालुक्यात एक गट वाढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

2011 च्या जनणगणनेत 10 टक्के वाढ

महापालिका, नगरपालिकेच्या धर्तीवर 2011 मधील लोकसंख्येत 10 टक्के वाढ गृहत धरून जिल्हा परिषदेतील गट आणि पंचायत समितीतील गणांची फेररचना करण्याचे काम प्रगती पथावर आहे. जिल्हा परिषदेचे 8 गट आणि पंचायत, समित्यांचे 16 गण वाढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या अधिनियम 1961 मधील तरतुदींनुसार, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची मुदत संपण्यापूर्वी त्यांची सार्वत्रिक निवडणूक घेणे बंधनकारक असल्याचे नमूद करत जिल्हाधिकाऱ्यांना 18 नोव्हेंबर 2021 रोजी पत्र पाठवले होते. त्यानुसार, जिल्हा परिषदेची सदस्य संख्या निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आता हा फेररचना अहवाल राज्य शासनासमोर सादर होईल. त्यानंतर प्रत्यक्ष प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर केला जाईल.

गटातील गावांची संख्याही कमी होणार

नव्या रचनेनुसार, जिल्हा परिषदेतील गटांतील गावांची संख्याही कमी होईल. पूर्वी एका गटात 23 ते 25 गावांचा समावेश होता. आता गटाच्या रचनेसाठी 25 ते 30 हजार मतदारसंख्येचा एक गट हा निकष लावण्यात येत आहे. त्यामुळे गटातील गावांची संख्याही 21 ते 23 पर्यंत असेल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

गट आणि गणांमध्ये किती वाढ?

याआधीच्या 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 62 झाली होती. तर गणांची संख्या 124 एवढी होती. आता यामध्ये 8 गट आणि 16 गणांची वाढ झाली आहे. म्हणजेच जिल्हा परिषदेत 62 ऐवजी 70 गट असतील तर 124 ऐवजी आता 140 असतील. परिणामी यंदा जिल्ह्यात 8 वाढीव जिल्हा परिषद सदस्य आणि 16 पंचायत समितीचे सदस्य निवडले जातील. सध्या वाढीव लोकसंख्येनुसार एका गटात 35 हजार 703 एवढी लोकसंख्या असेल .

इतर बातम्या-

काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला बेवकूफ बनवू नये, मुस्लिम आरक्षणावरून इम्तियाज जलील भडकले, विधानभवनात नेत्यांच्या काय प्रतिक्रिया?

रामदास कदम यांना विधानभवनात जाण्यापासून आधी अडवलं, नंतर सोडलं; फोनाफोनी कामी आली?

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.