AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिकांना बसतोय पावसाचा फटका, शिवारात उभ्या पिकाची काळजी कशी घ्याल, जाणून घ्या कृषी हवामान सल्ला

कापूस, मूग, उडीद, मका आदी बहुतांश पिकांत मुसळधार पावसामुळे पाणी साठले असेल तर अतिरिक्त पाणी काढून टाकावे. फवारणीची कामे पुढे ढकलावीत, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

पिकांना बसतोय पावसाचा फटका, शिवारात उभ्या पिकाची काळजी कशी घ्याल, जाणून घ्या कृषी हवामान सल्ला
संग्रहित छायाचित्र
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Sep 07, 2021 | 5:58 PM
Share

औरंगाबाद: परतीच्या पावसाने मराठवाड्यात दमदार हजेरी लावली असून विविध जिल्ह्यांमध्ये खरीपाच्या पिकांवरही त्याचा परिणाम झाला आहे. औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, परभणी आणि लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडला. उस्मनाबाद, हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस (Heavy rainfall in Usmanabad, Hingoli, Marathwada) झाला. 8 सप्टेंबर रोजीही औरंगाबाद व जालन्यात भरपूर पाऊस होईल तसेच पुढील 12 ते 18 सप्टेंबर या पाच दिवसातही मराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस होईल, असा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने (Vasantrao Naik Marathwada Agricultural University, Parbhani) शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या पिकांसाठी योग्य सल्ला दिला आहे.

कापूस, तूर, मूग/उडीदाची काय स्थिती?

तज्ञांच्या सल्ल्यानुसार, कापूस सध्या पाते लागणे ते बोंड धरण्याच्या स्थितीत आहे. मागील आठवड्यातील पावसामुले कापूस पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज असल्याने फवारणीची कामे पुढे ढकलावीत. तूरीला फांद्या फुटण्याचे दिवस असल्याने तुरीतीलही अतिरिक्त पाणी काढून द्यावे. फवारणी आताच करु नये. मूग व उडीदाचे पिक सध्या काढणीच्या स्थितीत असल्याने पिकाची काढणी सुरक्षित ठिकाणीच साठवावी. ती पावसात भिजणार नाही, याची काळजी घ्यावी.

भुईमूग, मका सध्या कोणत्या अवस्थेत?

भुईमूग सध्या फुलधारणा अवस्थेत आहे. त्यामुळे पिकात पाणी साठले असेल तर अतिरिक्त पाणी काढून टाकावे. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. तसेच मक्याचीही सध्याची वाढीची स्थिती असल्याने अतिरिक्त पाणी साठू देऊ नये. तसेच केळी, आंबा, द्राक्ष, सिताफळ आदी फळांमध्ये सध्या वाढीचा काळ असल्यामुळे फळबागेतील अतिरिक्त पाणी काढून टाकण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. काढणीस तयार असलेल्या भाज्या काढून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. यासंबंधीची माहिती परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागातील मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी दिली आहे.

पशुधनाची काळजी कशी घ्याल?

गेल्या काही दिवसांपासून दमट हवामान व सततच्या पावसामुळे पशुधनाला आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यत असते. पावसात जनावरांचे गोठे कोरडे राहतील, अशी काळजी घ्यावी. जनावरांना कोरड्या जागी बांधावे, पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच जनावरांना सर्दी, निमोनिया यासारख्या आजारांची लक्षणे दिसल्यास त्वरीत पशूवैद्यकाच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना तज्ञांनी दिल्या आहेत. (How to take care of crops in current heavy rainfall in Marathwada region, Maharashtra)

इतर बातम्या- 

बीडवर दुष्काळाचं सावट, सोयाबीन करपू लागलं; पीक विमा कधी मिळणार? कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांची मागणी

महाराष्ट्राच्या शेती विकासात महत्वपूर्ण योगदान, पद्मश्री बनबिहारी निंबकर यांचे निधन

Follow Us
Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
मुंबईत मराठींना नो एंट्री?; Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट!
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; संजय राऊतांनी अमित शाहांचं नाव घेत केला मोठा गौप्यस्फोट! म्हणाले....
लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार?
Sanjay Raut | लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार? संजय राऊतांचा थेट हल्ला; लंडन दौऱ्यावरून खळबळ!
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब,
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब, नंतर अचानक... काय घडलं?
12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
Nashik | लासलगावमध्ये नाफेडचा मोठा दणका!; 12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं?
Girish Mahajan | ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं? भाजपच्या दिल्ली दरबारातून नाराजीची चर्चा!
नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर
Gokul Gite | नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर ठाम
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!