AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिकांना बसतोय पावसाचा फटका, शिवारात उभ्या पिकाची काळजी कशी घ्याल, जाणून घ्या कृषी हवामान सल्ला

कापूस, मूग, उडीद, मका आदी बहुतांश पिकांत मुसळधार पावसामुळे पाणी साठले असेल तर अतिरिक्त पाणी काढून टाकावे. फवारणीची कामे पुढे ढकलावीत, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

पिकांना बसतोय पावसाचा फटका, शिवारात उभ्या पिकाची काळजी कशी घ्याल, जाणून घ्या कृषी हवामान सल्ला
संग्रहित छायाचित्र
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Sep 07, 2021 | 5:58 PM
Share

औरंगाबाद: परतीच्या पावसाने मराठवाड्यात दमदार हजेरी लावली असून विविध जिल्ह्यांमध्ये खरीपाच्या पिकांवरही त्याचा परिणाम झाला आहे. औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, परभणी आणि लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडला. उस्मनाबाद, हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस (Heavy rainfall in Usmanabad, Hingoli, Marathwada) झाला. 8 सप्टेंबर रोजीही औरंगाबाद व जालन्यात भरपूर पाऊस होईल तसेच पुढील 12 ते 18 सप्टेंबर या पाच दिवसातही मराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस होईल, असा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने (Vasantrao Naik Marathwada Agricultural University, Parbhani) शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या पिकांसाठी योग्य सल्ला दिला आहे.

कापूस, तूर, मूग/उडीदाची काय स्थिती?

तज्ञांच्या सल्ल्यानुसार, कापूस सध्या पाते लागणे ते बोंड धरण्याच्या स्थितीत आहे. मागील आठवड्यातील पावसामुले कापूस पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज असल्याने फवारणीची कामे पुढे ढकलावीत. तूरीला फांद्या फुटण्याचे दिवस असल्याने तुरीतीलही अतिरिक्त पाणी काढून द्यावे. फवारणी आताच करु नये. मूग व उडीदाचे पिक सध्या काढणीच्या स्थितीत असल्याने पिकाची काढणी सुरक्षित ठिकाणीच साठवावी. ती पावसात भिजणार नाही, याची काळजी घ्यावी.

भुईमूग, मका सध्या कोणत्या अवस्थेत?

भुईमूग सध्या फुलधारणा अवस्थेत आहे. त्यामुळे पिकात पाणी साठले असेल तर अतिरिक्त पाणी काढून टाकावे. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. तसेच मक्याचीही सध्याची वाढीची स्थिती असल्याने अतिरिक्त पाणी साठू देऊ नये. तसेच केळी, आंबा, द्राक्ष, सिताफळ आदी फळांमध्ये सध्या वाढीचा काळ असल्यामुळे फळबागेतील अतिरिक्त पाणी काढून टाकण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. काढणीस तयार असलेल्या भाज्या काढून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. यासंबंधीची माहिती परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागातील मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी दिली आहे.

पशुधनाची काळजी कशी घ्याल?

गेल्या काही दिवसांपासून दमट हवामान व सततच्या पावसामुळे पशुधनाला आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यत असते. पावसात जनावरांचे गोठे कोरडे राहतील, अशी काळजी घ्यावी. जनावरांना कोरड्या जागी बांधावे, पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच जनावरांना सर्दी, निमोनिया यासारख्या आजारांची लक्षणे दिसल्यास त्वरीत पशूवैद्यकाच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना तज्ञांनी दिल्या आहेत. (How to take care of crops in current heavy rainfall in Marathwada region, Maharashtra)

इतर बातम्या- 

बीडवर दुष्काळाचं सावट, सोयाबीन करपू लागलं; पीक विमा कधी मिळणार? कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांची मागणी

महाराष्ट्राच्या शेती विकासात महत्वपूर्ण योगदान, पद्मश्री बनबिहारी निंबकर यांचे निधन

Follow Us
अखेर मुलाच्या कष्टाचं चीज झालं; दीपके यांच्या आईची भावनिक प्रतिक्रिया
रात्रभर झोप नव्हती... अखेर मुलाच्या कष्टाचं चीज झालं; प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दीपके यांच्या आईची भावनिक प्रतिक्रिया
आत्ता जर सरकारने ऐकलं नाही तर... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर...
आत्ता जर सरकारने ऐकलं नाही तर... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर दमानियांची सुचक प्रतिक्रिया
This is the Beginning of the End... मोदी सरकारचा शेवट जवळ आलाय
This is the Beginning of the End... मोदी सरकारचा शेवट जवळ आलाय; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया
इकडे धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा तिकडे मुख्यमंत्री फडणवीस थेट दिल्लील
इकडे धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा तिकडे मुख्यमंत्री फडणवीस थेट दिल्लीला रवाना; मोठ्या...
उशिरा का होईना, न्याय मिळालाच, ही युवा पिढी जिंकली! - सुप्रिया सुळे
Supriya Sule | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; उशिरा का होईना, न्याय मिळालाच, ही युवा पिढी जिंकली!
भर मंचावरूनच... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंची पहिली...
भर मंचावरूनच... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, पहा व्हिडीओ
धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा
Dharmendra Pradhan Resign | धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा देताच...
NEET पेपरफुटी प्रकरणात सरकार झुकलं; धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा
मोठी बातमी! NEET पेपरफुटी प्रकरणात सरकार झुकलं; धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा
दिल्लीत मोठ्या घडमोडी! पुन्हा पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज अन्....
दिल्लीत मोठ्या घडमोडी! पुन्हा पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज अन् जंतर मंतरवर मोठा गोंधळ
गेल्या 12 वर्षात इतकं घाबरवलंय की... अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन
गेल्या 12 वर्षात इतकं घाबरवलंय की... अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन असं काय म्हणाला?