AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादसारख्या शहरात आठ दिवसांआड पाणी खेदजनक, राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांची खंत!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य किशोर शितोळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. विद्यापीठांच्या स्वायत्ततेला तिलांजली देणाऱ्या महाविकास आघाडीच्या विधेयकास मंजुरी देऊ नका, अशी मागणी त्यांनी केली.

औरंगाबादसारख्या शहरात आठ दिवसांआड पाणी खेदजनक, राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांची खंत!
राज्यपालांचे स्वागत करताना औरंगाबादचे जिल्हाधिकारी
| Edited By: | Updated on: Feb 04, 2022 | 3:47 PM
Share

औरंगाबादसारख्या ऐतिहासिक वारसा असलेल्या शहरालाही सात ते आठ दिवसांनी पिण्याचे पाणी मिळते, ही खेदाची बाब आहे, अशी खंत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) यांनी गुरुवारी यांनी गुरुवारी व्यक्त केली. राज्यपाल गुरुवारी औरंगाबाद शहरात (Aurangabad city) दुपारी दाखल झाले. विमानतळावर रोहयो मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre), आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी त्यांचे स्वागत केले. सुभेदारी विश्रामगृगहात त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी सैनिकी विभाग, रेडक्रॉस, मानव विकास मिशन आणि मराठवाडा विकास मंडळाचा त्यांनी आढावा घेतला.

राज्यपालांसमोर चर्चेला आलेले मुद्दे कोणते?

– जागतिक पर्यटनस्थळांमुळे औरंगाबाद शहराला महत्त्व आहे. अशा जागतिक ख्यातीच्या शहराला आठ दिवसांनी पाणीपुरवठा होणे खेदजनक असल्याची भावना राज्यपालांनी व्यक्त केली. येथील लोकप्रतिनिधी, सरकारमधील मंत्री काय करीत आहेत, त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे राज्यपाल म्हणाले. – सध्या औरंगाबादेत गाजत असलेल्या घरकुल योजनेचा मुद्दाही राज्यपालांसमोर मांडण्यात आला. पंतप्रधान आवास योजनेला जिल्हा आणि मनपा प्रशासनातील बेबनावामुळे जागा मिळत नसल्याने ही योजना रेंगाळली आहे. – तसेच शहरात महिला अत्याचारात वाढ झाल्याची तक्रार भाजपचे आमदार सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, राजू शिंदे आदींनी निवेदनाद्वारे केली. – तसेच शहरातील पाणीपुरवठा योजनेचे काम मंद गतीने सुरु असल्याची तक्रारही भाजपच्या वतीने करण्यात आली. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य किशोर शितोळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. विद्यापीठांच्या स्वायत्ततेला तिलांजली देणाऱ्या महाविकास आघाडीच्या विधेयकास मंजुरी देऊ नका, अशी मागणी त्यांनी केली.

इतर बातम्या-

Antilia Bomb Scare: अँटिलिया बॉम्ब प्लांटचा मुख्य सूत्रधार परमबीर सिंगच, नवाब मलिक यांचा दावा

Pune Building Slab Collapse| पुणे स्लॅब दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत, घटनेची चौकशी करणार; राज्य सरकारची घोषणा

Follow Us
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती.
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!.
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?.
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?.
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.