AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marathwada Weather : देर आऐ..दुरुस्त आए…मराठवाड्यातही मान्सून सक्रीय, पुढच्या दोन दिवसांचा अंदाज काय?

मराठवाड्यात पावसाअभावी शेतकऱ्यांनी धुळपेरणी केली होती. मात्र, पिकांना ओढ मिळाल्याने पिके सुकली आहे. तर आता 75 ते 100 मिमी पाऊस झाला असेल तरच खरिपाची पेरणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

Marathwada Weather : देर आऐ..दुरुस्त आए...मराठवाड्यातही मान्सून सक्रीय, पुढच्या दोन दिवसांचा अंदाज काय?
| Updated on: Jul 05, 2022 | 5:45 PM
Share

औरंगाबाद : राज्यात मान्सूनचे (Monsoon) आगमन झाल्यापासून मराठवाड्यावर अवकृपाच राहिली आहे. सरासरी सोडा खरीप पेरणी लायकही पाऊस झाला नव्हता. त्यामुळे खरिपाचे काय होणार ही चिंता सतावत असताना जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून चित्र बदलले आहे. हवामान विभागाने (Meteorological department) वर्तवलेला अंदाज खरा ठरत असून आगामी 24 तासांमध्ये देखील या विभागात पाऊस सक्रीय राहणार आहे. परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पण मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे. तर 7 जुलै रोजी औरंगाबाद (Aurangabad Rain), जालना, परभणी आणि हिंगोली तर 8 जुलै रोजी औरंगाबाद, जालना जिल्ह्यात वरुणराजाची कृपादृष्टी राहणार आहे.

पुढील तीन दिवस अशी राहणार स्थिती

हवामान विभागाने 8 जुलैपर्यंत पावसामध्ये सातत्य राहणार असल्याचे सांगितले आहे. चार दिवस वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. यामध्ये 5 जुलै रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड तर 6 जुलै रोजी परभणी, हिंगोली, नांदेड तर 7 जुलै रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली,नांदेड जिल्ह्यात व 8 जुलैरोजी औरंगाबाद, जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

जुलै महिन्यात बदलली परिस्थिती

राज्यात मान्सून दाखल झाल्यापासून केवळ कोकण आणि मुंबई या भागातच महेरबान झाला होता. मात्र, 1 जुलैपासून मराठवाडा विभागातही सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. यामध्ये उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी येथे कृपादृष्टी झाली आहे. त्यामुळे रखडलेली खरीप कामे वेगात सुरू झाली आहेत. शिवाय 8 जुलैपर्यंत पावसामध्ये सातत्य राहणार आहे. त्यामुळे रखडलेल्या पेरण्याही होतील आहे उगवण झालेल्या पिकलाही नवसंजीवनी मिळेल.

हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला

संबंध जून महिन्यात एकदाही समाधानकारक पाऊस मराठवाड्यात बरसलेला नव्हता. शिवाय हवामान खात्याने अंदाज वरतूनही या विभागाला पावसाने कायम हुलकावणी दिली होती. पण गेल्या 3 दिवसांपासून पाऊस सक्रिय तर झाला आहेच पण जोरही वाढला आहे. त्यामुळे उशिरा दाखल झालेला पाऊस कायम असाच रहावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

ओल बघा अन् चाढाल्यावर मूठ ठेवा

मराठवाड्यात पावसाअभावी शेतकऱ्यांनी धुळपेरणी केली होती. मात्र, पिकांना ओढ मिळाल्याने पिके सुकली आहे. तर आता 75 ते 100 मिमी पाऊस झाला असेल तरच खरिपाची पेरणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस झाला आहे. असे असले तरी कृषी सहाय्यकाच्या सल्ल्यानेच पेरणी करणे फायद्याचे ठरणार आहे

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.