AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यापीठ नामविस्ताराची 17 वर्षे पूर्ण; औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, शहिदांना अभिवादन

14 जानेवारी 1994 रोजी शरद पवार हे मुख्यमंत्री पदी असताना औरंगाबादमधील मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. या दिवसाला आज 17 वर्षे पूर्ण होत आहेत.

विद्यापीठ नामविस्ताराची 17 वर्षे पूर्ण; औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, शहिदांना अभिवादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 11:08 AM
Share

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज 28 वा नामविस्तार दिन आहे. 14 जानेवारी 1994 ला मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव बदलण्यात आले. या नामविस्ताराच्या लढ्यात शहीद झालेल्यांचे स्मारक उभारण्याची योजना असून स्मारकाचे भूमीपूजन आज सकाळी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले (Dr. Pramod Yewle) यांच्या हस्ते करण्यात आले. आज विद्यापीठाच्या नामविस्तार दिनी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या दिनानिमित्त कार्यकर्त्यांनी विद्यापीठ परिसरात गर्दी करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

BAMU, Aurangabad

विद्यापीठाच्या नामांतर लढ्यातील शहीद स्मारकाचे भूमीपूजन

कुलगुरुंच्या हस्ते भूमीपूजन

14 जानेवारी रोजी शहीद स्मारकाचे उद्घाटन करण्याचे कुलगुरूंनी जाहीर केले होते. मात्र जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी कोरोना नियमावलीअंतर्गत या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे कार्यक्रम घ्यावा की नाही, अशी द्विधा मनःस्थिती कुलगुरुंसमोर झाली होती. मात्र आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनीही कुलगुरुंच्या दालन गाठून हा कार्यक्रम झालाच पाहिजे, असा आग्रह धरला. अखेर आज शुक्रवारी सकाळी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत नामविस्तार लढ्यातील शहीदांच्या स्मारकाचे भूमीपूजन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते पार पडले.

नामांतराच्या लढ्याला 17 वर्षे पूर्ण

औरंगाबादमधील मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव देण्यासाठी तब्बल17 वर्षांचा लढा द्यावा लागला. 1978 मध्ये या नामांतर लढ्याला सुरुवात झाली. यासाठी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर अनेकांना तुरुंगात जावे लागले. ज्या मराठवाड्यात बाबासाहेबांमुळे गोरगरिबांना शिक्षण मिळतेय, त्यांचे नाव विद्यापीठाला द्यायला हवं, अशी मागणी जोर धरू लागली होती. अखेर 14 जानेवारी 1994 रोजी शरद पवार हे मुख्यमंत्री पदी असताना विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. या दिवसाला आज 17 वर्षे पूर्ण होत आहेत.

इतर बातम्या-

shakambhari navratri 2022 | आस्था, श्रद्धेचा शाकंभरी नवरात्र उत्सव, कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा जल्लोषात जागर

चंद्रकांत पाटलांसह भाजपच्या नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल; संजय राऊतांनाच खोचक टोला

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.