AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“वाकडं बघणाऱ्या दिल्लीश्वरला याच मातीत गाडू”; सरकारवर राष्ट्रवादीच्या नेत्याचा घणाघात

जिथं जिथं वज्रमूठ जाईल तिथं तिथं कोणती कोणती ना यात्रा मुख्यमंत्री सुरु करत आहेत. इतकं हे सरकार धास्तवलं आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

वाकडं बघणाऱ्या दिल्लीश्वरला याच मातीत गाडू; सरकारवर राष्ट्रवादीच्या नेत्याचा घणाघात
| Updated on: Apr 02, 2023 | 7:39 PM
Share

छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीच्या या वज्रमूठ सभेमुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे. यावेळी धनंजय मुंडे यांनी शिवसेना आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल करत त्यांनी भाजपचा वर्धापन दिन आता 1 एप्रिल रोजी साजरा करा असं आवाहनही त्यांनी यावेळी केले. महाराष्ट्राची चेष्टा भाजपने गेल्या अनेक दिवसांपासून चालू केली आहे. त्यामुळे आता भाजपचा वर्धापन दिन साजरा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीका करताना हा मराठवाडा क्रांतिकाराकांचा मराठवाडा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले मात्र त्यानंतर अथक परिश्रमातून 17 सप्टें 1948 रोजी खऱ्या अर्थाने मराठवाड्याला मुक्ती मिळाली असल्याचे सांगत ही आमच्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट असल्याचे मत त्यांना यावेळी मांडले.

धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले या सरकारच्या विरोधाताली पहिली सभा ही क्रांतिकारक संभाजीनगरमध्ये होत आहे. मात्र या मराठवाड्याचा उज्ज्वल इतिहास आहे.

ज्या ज्यावेळी दिल्लीश्वराने महाराष्ट्राकडे वाकडी नजर करून पाहिली आहे. त्यात्यावेळी या मातीत गाडायची ताकद या मराठवाड्याने दाखवून दिली आहे असा इशारा भाजपला त्यांनी दिला आहे.

वज्रमूठ सभेच्या तारखेलाच मुख्यमंत्र्यांची एक यात्रा होत आहे. त्यांची ताकद दाखवण्यासाठी ही यात्रा होते आहे की सरकार धास्तावलं आहे म्हणून ही यात्रा होते असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

जिथं जिथं वज्रमूठ जाईल तिथं तिथं कोणती कोणती ना यात्रा मुख्यमंत्री सुरु करत आहेत. इतकं हे सरकार धास्तवलं आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो अर्थसंकल्प सादर केला आहे. त्या अर्थसंकल्पाला पंचामृत हे नाव दिले आहे. मात्र या अर्थसंकल्पामध्येच देवेंद्र फडणवीस यांनी एप्रिल फुल केले आहे असा टोला त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

Follow Us
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.