AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“वाकडं बघणाऱ्या दिल्लीश्वरला याच मातीत गाडू”; सरकारवर राष्ट्रवादीच्या नेत्याचा घणाघात

जिथं जिथं वज्रमूठ जाईल तिथं तिथं कोणती कोणती ना यात्रा मुख्यमंत्री सुरु करत आहेत. इतकं हे सरकार धास्तवलं आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

वाकडं बघणाऱ्या दिल्लीश्वरला याच मातीत गाडू; सरकारवर राष्ट्रवादीच्या नेत्याचा घणाघात
| Updated on: Apr 02, 2023 | 7:39 PM
Share

छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीच्या या वज्रमूठ सभेमुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे. यावेळी धनंजय मुंडे यांनी शिवसेना आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल करत त्यांनी भाजपचा वर्धापन दिन आता 1 एप्रिल रोजी साजरा करा असं आवाहनही त्यांनी यावेळी केले. महाराष्ट्राची चेष्टा भाजपने गेल्या अनेक दिवसांपासून चालू केली आहे. त्यामुळे आता भाजपचा वर्धापन दिन साजरा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीका करताना हा मराठवाडा क्रांतिकाराकांचा मराठवाडा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले मात्र त्यानंतर अथक परिश्रमातून 17 सप्टें 1948 रोजी खऱ्या अर्थाने मराठवाड्याला मुक्ती मिळाली असल्याचे सांगत ही आमच्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट असल्याचे मत त्यांना यावेळी मांडले.

धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले या सरकारच्या विरोधाताली पहिली सभा ही क्रांतिकारक संभाजीनगरमध्ये होत आहे. मात्र या मराठवाड्याचा उज्ज्वल इतिहास आहे.

ज्या ज्यावेळी दिल्लीश्वराने महाराष्ट्राकडे वाकडी नजर करून पाहिली आहे. त्यात्यावेळी या मातीत गाडायची ताकद या मराठवाड्याने दाखवून दिली आहे असा इशारा भाजपला त्यांनी दिला आहे.

वज्रमूठ सभेच्या तारखेलाच मुख्यमंत्र्यांची एक यात्रा होत आहे. त्यांची ताकद दाखवण्यासाठी ही यात्रा होते आहे की सरकार धास्तावलं आहे म्हणून ही यात्रा होते असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

जिथं जिथं वज्रमूठ जाईल तिथं तिथं कोणती कोणती ना यात्रा मुख्यमंत्री सुरु करत आहेत. इतकं हे सरकार धास्तवलं आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो अर्थसंकल्प सादर केला आहे. त्या अर्थसंकल्पाला पंचामृत हे नाव दिले आहे. मात्र या अर्थसंकल्पामध्येच देवेंद्र फडणवीस यांनी एप्रिल फुल केले आहे असा टोला त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...