AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसमध्ये ज्यांचे कोणी नाही त्यांच्यासोबत मी आहे; नितीन राऊतांचा कार्यकर्त्यांना ग्वाही

औरंगाबाद जिल्ह्यात कॉंग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका. काँग्रेसमध्ये ज्यांचे कोणी नाही त्यांच्यासोबत मही आहे, अशी ग्वाही ऊर्जा मंत्री नितीन राऊत (nitin raut) यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिली आहे.

काँग्रेसमध्ये ज्यांचे कोणी नाही त्यांच्यासोबत मी आहे; नितीन राऊतांचा कार्यकर्त्यांना ग्वाही
nitin raut
| Edited By: | Updated on: Jun 13, 2021 | 7:40 AM
Share

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात कॉंग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका. काँग्रेसमध्ये ज्यांचे कोणी नाही त्यांच्यासोबत मही आहे, अशी ग्वाही ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिली आहे. राऊत औरंगाबाद जिल्ह्यातील दौऱ्यावर आले होते. त्यावेळी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हा शब्द दिला आहे. (nitin raut addressed congress workers in aurangabad)

नितीन राऊत दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये होते. यावेळी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व माजी आमदार कल्याण काळे, माजी आमदार नारायण पवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मीनाताई शेळके, शहर अध्यक्ष हिशाम उस्मानी, महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे, महिला काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष सीमाताई थोरात उपस्थित होते. या सर्वांनी राऊत यांचा सत्कार केला.

काँग्रेसची विचारधारा ही राज्यघटनेची विचारधारा आहे. काँग्रेस केवळ एक पक्ष नसून एक विचार आहे. समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचे विचार हे काँग्रेसच्या राजकीय विचारधारेचा भाग आहेत, असं सांगतानाच काँग्रेसमध्ये ज्यांचे कोणी नाही त्यांच्यासोबत मी आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी आहेत आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आहेत. औरंगाबाद महानगरपालिका निवडणूकीत जी काही मदत लागेल ती काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष वा शहर अध्यक्ष यांनी सांगावी, मी मदत नक्की करेल, असा शब्द त्यांनी दिला.

औरंगाबादशी भावनिक जवळीक

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचे निर्माण केल्यानंतर औरंगाबाद शहराला शिक्षण क्षेत्रातील क्रांतीसाठी निवडले. म्हणून औरंगाबाद शहर मला अधिक प्रिय आहे. विदर्भ आणि मराठवाडयात अनेक साम्य आहेत, असे राऊत म्हणाले. औरंगाबाद शहराचे संपर्क मंत्री हे अमित देशमुख असून ते खूप चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. (nitin raut addressed congress workers in aurangabad)

संबंधित बातम्या:

2024नंतरही ‘ते’ भावी पंतप्रधानच असतील; अतुल भातखळकरांचं खोचक ट्विट

वारीची परंपरा टिकली पाहिजे, पण कुंभमेळ्यात घडलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दक्षता: अजित पवार

फडणवीसांच्या सरकारमध्ये शिवसेनेला गुलामासारखी वागणूक मिळाली; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

(nitin raut addressed congress workers in aurangabad)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...