AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raosaheb Danve : महाराष्ट्रात आणीबाणी सदृश्य परिस्थिती, केंद्रीय मंत्री दानवेंचं मोठं विधान; भाजपच्या मनात नेमकं काय?

रावसाहेब दानवे म्हणाले, पोलिसांना पुढं करून राजकारण करण्याचा धंदा सुरू केलाय. पोलिसांना बदनाम करण्याचं काम महाराष्ट्र सरकार करतंय. त्यांनी मातोश्रीवर जायला हवं, या मताचे आम्ही नाही. पण सरकारच्या प्रतिनिधींनी जायला हवं, त्यांची समजून काढायला हवी होती.

Raosaheb Danve : महाराष्ट्रात आणीबाणी सदृश्य परिस्थिती, केंद्रीय मंत्री दानवेंचं मोठं विधान; भाजपच्या मनात नेमकं काय?
रावसाहेब दानवे.
| Edited By: | Updated on: Apr 24, 2022 | 5:45 PM
Share

औरंगाबादः महाराष्ट्रात (Maharashtra) आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. किरीट सोमय्या यांच्या ड्राइव्हरवर गुन्हा दाखल झाला. मात्र, शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला नाही. बॉम्बस्फोटावेळी देखील महाराष्ट्रात जेवढी परिस्थिती खराब झाली नव्हती, तेवढी परिस्थिती आज खराब झाली आहे, असे विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केले आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपच्या मनात नेमके काय सुरू आहे, याची चर्चा सुरू झालीय. शिवसेनेसह विरोधी पक्षांनी भाजपचा (BJP) महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याचा मनसुबा आहे, असे आरोप यापूर्वीच करण्यात आले आहेत. त्यासाठीच महाराष्ट्रातील परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही होत आहे. त्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवटीची चर्चा सुरू झालीय.

शिवसैनिकांनी दबाव निर्माण केला

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, महाराष्ट्रात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. किरीट सोमय्या यांच्या ड्राइव्हरवर गुन्हा दाखल झाला. मात्र, शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला नाही. बॉम्बस्फोटावेळी देखील महाराष्ट्रात जेवढी परिस्थिती खराब झाली नव्हती, तेवढी परिस्थिती आज खराब झाली आहे. राणा कुटुंबाच्या घराबाहेर असलेले शिवसैनिक पोलिसांनी हटवले नाहीत. आंदोलकांशी सरकारचे प्रतिनिधी जाऊन चर्चा करतात, पण राणा दाम्पत्यांशी केली नाही. उलट शिवसैनिक पाठवून दबाव निर्माण केला जात आहे. राणा दाम्पत्याना अटक केली जाते, पण राणा कुटुंबाच्या घराबाहेर असलेले शिवसैनिक पोलिसांनी हटवले नाहीत, अशा आरोपांच्या फैरीही दानवे यांनी झाडल्या.

पोलिसांना पुढं करून राजकारण

रावसाहेब दानवे म्हणाले, पोलिसांना पुढं करून राजकारण करण्याचा धंदा सुरू केलाय. पोलिसांना बदनाम करण्याचं काम महाराष्ट्र सरकार करतंय. त्यांनी मातोश्रीवर जायला हवं, या मताचे आम्ही नाही. पण सरकारच्या प्रतिनिधींनी जायला हवं, त्यांची समजून काढायला हवी होती. अण्णांची जशी सरकारनं समजून काढली होती, तशी समजून काढता आली असती. पण गुंडगिरी करुन त्यांचा डाव हाणून पाडलं, महाराष्ट्राला हे शोभनीय नाही.

इतर बातम्याः

Amravati Shiv Sena | राणांचे हनुमान चालीसा वाचन स्थगित, अमरावतीत फटाके फोडून शिवसैनिक परतले

Sanjay Raut | खासदार बाई यांचा हिंदुत्वाचा संबंध काय? संजय राऊत यांचा नवनीत राणा यांच्यावर घणाघात

Amravati Shiv Sainik | रवी राणांचा घरावर दगडफेक केल्याचा आरोप; अमरावतीत शिवसैनिक आक्रमक

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.