AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अबू आझमी समजूतदार नेते, संभाजीनगरबाबत त्यांच्याशी चर्चा करु : संजय राऊत

30 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर असं केलं आहे, याचा पुनरुच्चार राऊतांनी केला Sanjay Raut Abu Azmi Aurangabad

अबू आझमी समजूतदार नेते, संभाजीनगरबाबत त्यांच्याशी चर्चा करु : संजय राऊत
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jan 04, 2021 | 10:53 AM
Share

मुंबई : औरंगाबादबाबत शिवसेनेची भूमिका सर्व पक्षांना माहिती आहे. जे नामांतराला विरोध करतात त्या पक्षांना का भाजप विचारत नाही? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला. 30 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर असं केलं आहे, त्यावर फक्त सही शिक्का उमटायचा आहे, याचा पुनरुच्चार राऊतांनी केला. (Sanjay Raut on Abu Azmi Aurangabad renaming as Sambhajinagar)

औरंगाबादबाबत शिवसेनेची भूमिका सर्व पक्षांना माहिती आहे. औरंगाबाद आणि संभाजीनगर नावावर आमची भूमिका स्पष्ट आहे. भाजपच्या काळातच हे नामांतर व्हायला हवे होते. ते शिवसेनेला प्रश्न का विचारतात, जे नामांतराला विरोध करतात, त्या पक्षांना का भाजप विचारत नाही? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

भाजप पक्षाला काय प्रॉब्लेम आहे. औरंगाबाद विमानतळाच्या नामांतराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारसोबत पत्रव्यवहार केला, त्यावर केंद्र अजूनही निर्णय घेत नाही. भाजप नेते त्यावर का बोलत नाहीत, असा प्रतिप्रश्नच संजय राऊत यांनी विचारला.

शिवसेनाप्रमुख आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच नाव औरंगाबाद विमानतळाला द्यावे, असं उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. आपल्या आपल्या इच्छेवर अवलंबून आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा संभाजीनगरला काही विरोध असेल असं वाटत नाही. त्यांनी राम मंदिरालाही विरोध केला नव्हता. ते समजूतदार नेते आहेत, आम्ही त्यांच्याशी चर्चा करु, असंही राऊत म्हणाले. (Sanjay Raut on Abu Azmi Aurangabad renaming as Sambhajinagar)

दरम्यान, लसीवर कोणत्याही पक्षाचा हक्क नसतो. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे सुपर मॅन आहेत. भाजपची लस न घेण्याबाबत ते मस्करीत बोलले असतील, असंही संजय राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या :

शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का; किरीट सोमय्यांचा सवाल

‘चंद्रकांतदादांचे पत्रलेखन म्हणजे उकळत्या किटलीतील रटरटता चहा’, राऊतांचा टोला

(Sanjay Raut on Abu Azmi Aurangabad renaming as Sambhajinagar)

Follow Us
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत.
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप.
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार....
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार.....
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी.
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.