AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“संजय राऊत म्हणजे कलियुगातील शकुनी मामा”; अयोध्येच्या दौऱ्यानंतर शिवसेनेने राऊतांना घेरले…

लोकांना कन्फ्युज करण्याचा आणि कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी संजय राऊत टीका करण्याची आणि काहीही सांगण्याची स्टंटबाजी करतात असा टोलाही लगावला आहे.

संजय राऊत म्हणजे कलियुगातील शकुनी मामा; अयोध्येच्या दौऱ्यानंतर शिवसेनेने राऊतांना घेरले...
| Edited By: | Updated on: Apr 10, 2023 | 4:19 PM
Share

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही आमदार अयोध्या दौऱ्यावर गेल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे, चंद्रकांत खैरे यांनी या दौऱ्यावरून शिंदे गटावर सडकून टीका केली होती. त्या नंतर आता विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना सत्ताधारी गटातील आमदारानीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कालच्या दौऱ्याविषयी बोलताना आमदार संजय शिरसाठ यांनी सांगितले की, काल ज्या पद्धतीने आमचे उत्स्फूर्त स्वागत झाले तसे स्वागत आतापर्यंत अयोध्येमध्ये कुणाचेच झाले नाही.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही गेलो होतो त्यावेळेस पण असे स्वागत झाले नव्हते ज्या पद्धतीने आमचे स्वागत झाले. त्यामुळे संजय राऊत यांची पोटदुखी वाढली असल्याचा घणाघात शिरसाठ यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.

अयोध्येमध्ये मंदिरापर्यंत जायला आम्हा आमदारांना दोन तास लागले. त्यामुळे तेथे आलेले लोक हे स्वयंस्फूर्तीने आले होते.

लोकांच्या ज्या धार्मिक भावना आहेत. त्यावर टीका करण्याचे काम संजय राऊतसारखा पापी माणूस करतो अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

आमदार संजय शिरसाठ यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, संजय राऊत म्हणजे कलियुगातील शकुनीमामा आहे.

संजय राऊत हे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांना हिंदुत्वापासून दूर करायचे काम करत असल्याचे सांगत त्यांना हिंदुत्वावरून छेडण्याचा प्रयत्न केला आहे.

संजय शिरसाठ यांनी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगताना त्यांनी बाबरी मशिदीची आठवण करून दिली. यावेळी ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांनी म्हटले होते की, बाबरीचा ढाच्या माझ्या शिवसैनिकांनी पाडला असेल, तर आम्हाला त्याचा अभिमान आहे असे म्हणणारे शिवसेनाप्रमुख.

आणि आता रामाच्या यात्रेवर आम्ही गेलो यावर टीका करणारे संजय राऊत हा विरोधाभास आहे आणि आम्ही याला महत्त्व देत नाहीत अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

आम्ही कोणा सोबत घेऊन गेलो याचा अभ्यास आधी संजय राऊत यांनी करावा,मात्र तुम्ही मातोश्रीवर कुणाला घेऊन गेला हे जर आम्ही काढले तर तुम्हाला पळता भूई थोडी होईल असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला.

आमदारांच्या नाराजीच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, आमच्यात कोणीही नाराज नाही तुम्हाला कोणी आमचा आमदार भेटला का. त्यामुळे आमच्या आमदारांवर बोलण्यापेक्षा तुमच्याकडे जे आमदार आहेत त्यांना आधी तुम्ही सांभाळा राहिलेल्या 14 आमदारांपैकी किती आमदार तुमच्या मातोश्रीकडे येतात? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.संजय राऊक यांच्या टीकेवरूनही संजय शिरसाठ यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

लोकांना कन्फ्युज करण्याचा आणि कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी संजय राऊत टीका करण्याची आणि काहीही सांगण्याची स्टंटबाजी करतात असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.