AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Weather: मराठवाड्यात पुन्हा पावसाला सुरुवात, येत्या 3-4 दिवसात जोर वाढण्याची शक्यता, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोलीसह नांदेड अलर्टवर

औरंगाबाद आणि परिसरातील पावसाचा दोन दिवसांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 14 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Aurangabad Weather: मराठवाड्यात पुन्हा पावसाला सुरुवात, येत्या 3-4 दिवसात जोर वाढण्याची शक्यता, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोलीसह नांदेड अलर्टवर
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Sep 11, 2021 | 6:47 PM
Share

औरंगाबाद: मंगळवारी तुफान पावसानं मराठवाड्याला दणाणून सोडल्यानंतर येत्या तीन ते चार दिवसात मराठवाड्यासह महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. बंगालच्या उपसागरावर (Bay Of Bengol) कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्यानं महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain Forecast In Marathwada and Maharashtra) होण्याचा अंदाज, भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी दुपारपासून तर काही ठिकाणी संध्याकाळ पासून पावसाला सुरुवात झाली आहे. मंगळवारी या भागात जोरदार वृष्टी होण्याचे संकेत प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्यावतीनं जारी करण्यात आले आहेत.

औरंगाबादेत पुन्हा पावसाला सुरुवात

औरंगाबाद शहरात आज संध्याकाळपासूनच पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली. दुपारपासूनच शहरात ढग दाटून आले होते. काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झाली तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. शनिवारी संध्याकाळी ढग आणखी दाटून आल्याने रात्री मुसळधार पाऊस पडतो की काय अशी स्थिती आहे. मात्र हवामान विभागानं जारी केलेल्या अंदाजानुसार, पुढचे दोन दिवस म्हणजे 12 आणि 13 तारखेपर्यंत औरंगाबाद आणि परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. तर अगदी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल. मात्र येत्या 14 तारखेला म्हणजेच मंगळवारी औरंगाबाद, जालना, परभणी भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दिवशी हवामानातील बदलाकडे लक्ष ठेवून सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पुढील दोन दिवस मराठवाड्यात मध्यम पाऊस

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, शनिवार आणि रविवारी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मनाबाद, हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मात्र अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता फार कमी वर्तवण्यात आली आहे.

13 सप्टेंबरला मराठवाड्यात कुठे अलर्ट?

प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्या वतीनं जारी केलेल्या माहितीनुसार, 13 सप्टेंबर रोजी जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजेच हवामानातील बदलांनुसार येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या दिवशी औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आणि लातूरमध्ये मात्र हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

14 सप्टेंबरला औरंगाबादेत अलर्ट

औरंगाबाद आणि परिसरातील पावसाचा जोर दोन दिवसांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 14 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यातील आजची पावसाची स्थिती कशी राहील

भारतीय हवामान विभागानं रत्नागिरी, पुणे, रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला असून तिथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, दुसरीकडे सातारा, ठाणे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग, अमरावीत, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा गोंदिया जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या- 

Nashik Weather: नाशिकमध्ये दोन दिवस मोठा पाऊस नाही, पावसाळा लांबण्याची शक्यता

Weather Update: धुळे, नंदुरबारसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Follow Us
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.