AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंढरपुरात लढले, अंधेरीत नाही लढले, यातला फरक काय?; रावसाहेब दानवेंना विचारा

शरद पवार, राज ठाकरे यांनी मध्यस्ती करायला लावली.

पंढरपुरात लढले, अंधेरीत नाही लढले, यातला फरक काय?; रावसाहेब दानवेंना विचारा
रावसाहेब दानवेंना विचाराImage Credit source: tv 9
| Updated on: Oct 17, 2022 | 4:47 PM
Share

दत्ता कनवटे, TV9 मराठी, प्रतिनिधी, औरंगाबाद : कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले, खरं म्हणजे अंधेरीची (Andheri by-election) जागा आम्ही भाजपला सोडली होती. ती लढाईची की, नाही लढायची तो निर्णय भाजपचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अंधेरीची जागा भाजपला सोडली. त्यानंतर वरिष्ठ स्तरावर चर्चा झाली असेल. ही निवडणूक बिनविरोध झाली तर चांगलं होईल, असा प्रस्ताव ठेवला होता. त्यामुळं ही पोटनिवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला असावा, असं मला वाटतं, असं कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.

भाजपला पराभव दिसत होता. त्यामुळं माघार घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला. यावर अब्दुल सत्तार म्हणाले, श्री. लटके यांचं निधन झाले. त्या जागेवर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके या उमेदवारी लढवत आहेत. सर्व नेत्यांची सहानुभूती ही लटके यांच्याकडं आहे. त्यामुळं इतरांनीही आपली उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, अशी विनंतही अब्दुल सत्तार यांनी केली.

ऋतुजा लटके या सामान्य कुटुंबातल्या महिला आहेत. महापालिकेतील कर्मचारी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या पतीचं निधन झालं. त्यांना बिनविरोध निवडून दिल्यास अशी परंपरा पुढंही सुरू राहावी, असं मला वाटतं.

शरद पवार, राज ठाकरे यांनी मध्यस्ती करायला लावली. श्री लटके यांनी विधानसभेत, महापालिकेत चांगलं काम केलं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी ही जागा मिळावी. हा चांगला निर्णय आहे.

अब्दुल सत्तार यांनी सांगितलं की, शब्दाची नव्हे विकासाची बाणं चालवावीत. सर्व संमतीनं विकासाची बाणं चालवावीत. राज्यात शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, ग्रामीण भागाचे प्रश्न आहेत. सत्ताधारी पक्षानं पुढाकार घेतला आहे. पुढं याचे परिणाम दिसतील.

एकजुटीनं, एकमतानं सर्वपक्षीय निवडून देऊ लागले. याचा अर्थ एकमताची संमती आहे, असा निघतो. पंढरपुरात लढले. अंधेरीत नाही लढले यातला फरक रावसाहेब दानवेचं सांगू शकतात. माझ्या बाजूला बसले आहेत. तेच याचं सोयीस्कर उत्तर देऊ शकतात, असं अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

Follow Us
युद्धजन्य परिस्थितीचा नाशिकच्या कांदा उत्पादकांना फटका
युद्धजन्य परिस्थितीचा नाशिकच्या कांदा उत्पादकांना फटका.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण.
अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षामुळे जळगावातील केळी शेतकऱ्यांचे नुकसान
अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षामुळे जळगावातील केळी शेतकऱ्यांचे नुकसान.
खामेनींच्या मृत्यूनंतर दिल्लीतील इराण दूतावासातील झेंडा अर्ध्यावर
खामेनींच्या मृत्यूनंतर दिल्लीतील इराण दूतावासातील झेंडा अर्ध्यावर.
ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे खरबूजाची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल
ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे खरबूजाची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल.
एक जागा, तीन पक्ष; राज्यसभा उमेदवारीवर महाविकास आघाडीत खलबतं
एक जागा, तीन पक्ष; राज्यसभा उमेदवारीवर महाविकास आघाडीत खलबतं.
शरद पवार एनडीएसोबत जाणार का? संजय राऊत म्हणाले, खात्रीने सांगतो...
शरद पवार एनडीएसोबत जाणार का? संजय राऊत म्हणाले, खात्रीने सांगतो....
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात काय?
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात काय?.
सोलापूरात महापौर निवडीवरून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन
सोलापूरात महापौर निवडीवरून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन.
छत्रपती संभाजीनगरमधील कलाकेंद्रात मोठा राडा अन् तोडफोड,नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील कलाकेंद्रात मोठा राडा अन् तोडफोड,नेमकं काय घडलं?.