AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपचा अर्ज मागे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं कारण

त्यांच्या समर्थनार्थ हा उमेदवारी अर्ज मागे घेत आहोत.

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपचा अर्ज मागे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं कारण
चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं कारण
| Updated on: Oct 17, 2022 | 2:55 PM
Share

गजानन उमाटे, TV9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri by-election) भाजपनं अर्ज मागे घेतलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी आज नागपुरात ही घोषणा केली. ‘महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा लक्षात घेता आम्ही सहानुभूतीने हा अर्ज मागे घेत असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. मात्र आम्ही पराभवाच्या भीतीने माघार घेतली नाही. 2024 मध्ये आम्ही नक्की विजयी होऊ, असा दावाही बावनकुळे यांनी केलाय.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, रिपाई आणि भाजप यांनी कमळवर निवडणूक लढण्याचं निश्चित केलं होतं. मुरजी पटेल यांनी अंधेरीतून उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु, केंद्रीय आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वानं हा अर्ज परत घेण्याची घोषणा केली आहे. मुरजी पटेल यांचा अर्ज आम्ही परत घेत आहोत. या निवडणुकीत सौ. लटके या निवडून याव्यात. यासाठी त्यांच्या समर्थनार्थ हा उमेदवारी अर्ज मागे घेत आहोत.

मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरताना 15 हजार लोकांची रॅली काढण्यात आली होती. मुरजी पटेल हे अपक्ष लढणार नाहीत. एकदा भाजपचा उमेदवार ठरला की, तो भाजपच्या निर्णयाच्या विरोधात जात नाही. त्यामुळं मुरजी पटेल हे अपक्ष लढणार नाही, असं बावनकुळे यांनी स्पष्ट सांगितलं.

आमची संपूर्ण तयारी झाली. मतांची जुळवजुळव सुरू होती. आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्तवात ही निवडणूक जिंकणार होतो. पण, एक वर्षासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. असा निर्णय भाजपनं अनेकवेळा घेतला आहे. एखाद्याचं निधन होतं तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना संधी दिली जाते. ही भाजपची संस्कृती अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळापासून आहे.

त्यामुळं भाजपनं सौ. लटके यांना समर्थन दिलं आहे. पक्ष म्हणून आम्ही आमची उमेदवारी भरली.पूर्ण ताकद लावली. पण, राज्याची परंपरा, संस्कृती टिकविण्यासाठी उमेदवारी मागे घेत आहोत, असंही ते म्हणाले.

राज ठाकरेंचं पत्र हा एक भाग आहे. 1980 पासून अनेकवेळा अशा घटना आल्यात. त्यावेळी अशावेळी असा निर्णय घेतला. एखाद्या परिवारातील व्यक्तीचं निधन झाल्यास त्यांच्या कुटुबातील व्यक्ती निवडणूक लढत असेल, तर असा निर्णय घेतला जातो.

सौ. लटके वहिनी यांच्या पतीच्या निधनानंतर त्या ही पोटनिवडणूक लढत आहेत. त्यामुळं हा निर्णय वरिष्ठांनी केला. योग्य पद्धतीनं आमचं नेतृत्व निर्णय घेतो, असंही बावनकुळे यांनी सांगितलं.

Follow Us
युद्धजन्य परिस्थितीचा नाशिकच्या कांदा उत्पादकांना फटका
युद्धजन्य परिस्थितीचा नाशिकच्या कांदा उत्पादकांना फटका.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण.
अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षामुळे जळगावातील केळी शेतकऱ्यांचे नुकसान
अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षामुळे जळगावातील केळी शेतकऱ्यांचे नुकसान.
खामेनींच्या मृत्यूनंतर दिल्लीतील इराण दूतावासातील झेंडा अर्ध्यावर
खामेनींच्या मृत्यूनंतर दिल्लीतील इराण दूतावासातील झेंडा अर्ध्यावर.
ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे खरबूजाची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल
ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे खरबूजाची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल.
एक जागा, तीन पक्ष; राज्यसभा उमेदवारीवर महाविकास आघाडीत खलबतं
एक जागा, तीन पक्ष; राज्यसभा उमेदवारीवर महाविकास आघाडीत खलबतं.
शरद पवार एनडीएसोबत जाणार का? संजय राऊत म्हणाले, खात्रीने सांगतो...
शरद पवार एनडीएसोबत जाणार का? संजय राऊत म्हणाले, खात्रीने सांगतो....
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात काय?
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात काय?.
सोलापूरात महापौर निवडीवरून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन
सोलापूरात महापौर निवडीवरून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन.
छत्रपती संभाजीनगरमधील कलाकेंद्रात मोठा राडा अन् तोडफोड,नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील कलाकेंद्रात मोठा राडा अन् तोडफोड,नेमकं काय घडलं?.