AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीचे नियम बदलणार? बच्चू कडू यांनी तो आक्षेप घेताच… मोठी अपडेट समोर!

शेतकरी कर्जमाफी करताना गुंतागुंती वाढवली. त्यामुळे तोंड द्यावे लागत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे सरकार बदनाम होत असेल तर त्यावर निर्णय घेणे गरजेचे आहे, असेही यावेळी बच्चू कडू म्हणाले.

मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीचे नियम बदलणार? बच्चू कडू यांनी तो आक्षेप घेताच... मोठी अपडेट समोर!
bacchu kaduImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 24, 2026 | 3:56 PM
Share

Farmer Loan Waiver : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेत शेतकरी कर्जमाफीवर सविस्तर चर्चा झाली. आमदार बच्चू कडू यांनी या कर्जमाफी योजनेवर अनेक आक्षेप नोंदवले. तसेच सरकारने योग्य ते बदल करून घ्यावेत, अशी मागणी केली. राज्यातील 2017 सालच्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना, महात्मा ज्योतिबा फुला कर्जमाफी योजना तसेच या योजनांत प्रोत्साहनपर दिली जाणारी रक्कम काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. कर्जमाफीत नाव आलेले आहे पण बँकेत मात्र सरकारने पैसेच दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना नवे कर्ज भेटत नाहीये. कर्जमाफीची वाट पाहावी लागत आहे. उच्च न्यायालयानेही याबाबत सरकारला पैसे द्यापे लागतील, असे सांगितले. शेतकरी पात्र असतील तर पैसे द्यावे लागतील, असे म्हणत बच्चू कडू यांनी कर्जमाफी योजनेवर आक्षेप नोंदावला आहे. .

एखाद्या शेतकऱ्यावर दोन लाख कर्ज असेल तर…

तसेच सरकार म्हणतंय की 2019 सालच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेत लाभ भेटलेल्या शेतकऱ्याला तुम्ही फक्त 50 हजार रुपये दिले जातील. एखाद्या शेतकऱ्यावर दोन लाख कर्ज असेल तर तुम्ही 50 हजार द्यायचे आणि शेतकऱ्याने दीड लाख भरावे असं होत असेल तर ही एका प्रकारची बँकेची वसुलीच म्हणावी लागेल. या बाबत निर्णय घ्यावा लागेल.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे

शेतकरी कर्जमाफी करताना गुंतागुंती वाढवली. त्यामुळे तोंड द्यावे लागत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे सरकार बदनाम होत असेल तर त्यावर निर्णय घेणे गरजेचे आहे, असेही यावेळी बच्चू कडू म्हणाले. तर या प्रश्नाचे उत्तर देताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांसाठी धोरण तयार करताना त्या मध्ये या विचारांचा सहभाग करून घेऊ. शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि विकास सर्वांचा केंद्रबिंदू होता. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शेतकरी केंद्रबिंदू आहे. शेतकरी अडचणीत आला आहे त्याला पाठबळ दिलं पाहिजे, अशी भूमिका स्पष्ट केली.

56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांची कर्जमाफी

तसेच, 30 जून पूर्वी कर्ज माही दिली जाईल मुख्यमंत्री यांनी घोषणा केली होती. आचारसंहिता सुरू असल्यामुळे याबाबत खुलासा करता आला नाही. राज्यात 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासित केलं आहे. सूचनांचा विचार करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ होईल यासाठी सुधारणा करू, असेही दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

Follow Us
विलास घुले प्रकरणात मोठा ट्विस्ट! सौरभ सोनवणे प्रथमच माध्यमांसमोर...
Vilas Ghule Case | विलास घुले हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! सौरभ सोनवणे प्रथमच माध्यमांसमोर, नेमकं काय म्हणाले?
रायगडमध्ये पावसाचे रौद्ररुप; पर्यायी रस्ता वाहून गेल्याने संपर्क तुटला
Raigad Heavy Rain | रायगडमध्ये पावसाचे रौद्ररुप; पर्यायी रस्ता वाहून गेल्याने संपर्क तुटला
ठाकरे गटाला आणखी मोठा धक्का! थेट दिल्ली संसदेतील पक्षाचं कार्यालय
ठाकरे गटाला आणखी मोठा धक्का! थेट दिल्ली संसदेतील पक्षाचं कार्यालय जाणार? मोठी अपडेट समोर
15 लाख घरांची मोठी घोषणा! जयकुमार गोरेंचं विधानसभेत मोठं आश्वासन
15 लाख घरांची मोठी घोषणा! जयकुमार गोरेंचं विधानसभेत मोठं आश्वासन, म्हणाले...
धनंजय मुंडेंना थेट... बीडमध्ये मोठं घडतंय? बजरंग सोनावणेंच्या विधानाने
धनंजय मुंडेंना थेट... बीडमध्ये मोठं घडतंय? बजरंग सोनावणेंच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! काल बीकेसीत तर आज रेल्वे स्थानकावर आढळले विषारी...
मुंबईकरांनो सावधान! काल बीकेसीत तर आज रेल्वे स्थानकावर आढळले विषारी साप; चक्क रेल्वेच्या... पहा व्हिडीओ
6 फुटीर खासदारांच्या विरोधात खोके घेऊन रस्त्यावर उतरले ठाकरे समर्थक!
Jalna Thackeray Sena Protest | 6 फुटीर खासदारांच्या विरोधात खोके घेऊन रस्त्यावर उतरले ठाकरे समर्थक! थेट भीक मागत...
पद्मसिंह पाटलांच्या निर्दोष मुक्ततेनंतर मोठं घडणार; 8-10 दिवसांतच...
पद्मसिंह पाटलांच्या निर्दोष मुक्ततेनंतर मोठा निर्णय; 8-10 दिवसांतच... नातू मल्हार पाटलाने दिली सविस्तर माहिती
बापरे! थेट पूलच कोसळला, खडीने भरलेला ट्रक दरीत, पण ड्रायव्हर...
Video | बापरे! थेट पूलच कोसळला, खडीने भरलेला ट्रक दरीत, पण ड्रायव्हर...
लोकलचा दरवाजा बंद कर म्हणणं जीवावर बेतलं! 22 वर्षीय तरुणाची चाकूने....
मोठी बातमी! लोकलचा दरवाजा बंद कर म्हणणं जीवावर बेतलं! 22 वर्षीय तरुणाची चाकूने हत्या, नेमकं घडलं काय?