प्रेम प्रेम सगळं खरंय हो, पण वेळीच पारखून घेणंही महत्त्वाचं आहे, ऐन व्हॅलेंटाइन डेच्या पूर्वसंध्येला महिलेची दिल्ली ते बीड फरफट!

नितीनच्या प्रेमापोटी संपूर्ण जग सोडून देणारी अनुराधा कदाचित ह्या पहिल्याच महिला नसाव्यात. जगात प्रेमाचे अनेख आदर्श दाखले आहेत. मात्र प्रेम करताना निरखून पाहणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. हेच अनुराधा यांनी केलं असतं तर ही फरफट झालीच नसती.

प्रेम प्रेम सगळं खरंय हो, पण वेळीच पारखून घेणंही महत्त्वाचं आहे, ऐन व्हॅलेंटाइन डेच्या पूर्वसंध्येला महिलेची दिल्ली ते बीड फरफट!
बीडमध्ये आलेल्या अनुराधा
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 11:23 AM

बीड: आज व्हॅलेंटाइन दिवस (Valentine Day) आहे. संपूर्ण जगात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. आजच्या दिवशी जगात प्रेम कहाण्यांचे दाखले दिले जातात. मात्र प्रेम करताना समोरील व्यक्ती पारखून घेणंही तितकच महत्त्वाचं आहे. हे समजून घेण्यासाठी ऐन व्हॅलेंटाइन डे च्या पूर्वसंध्येला बीडमध्ये दिसलेल्या महिलेचं (Woman) उदाहरण बोलकं आहे. प्रेमात पडल्यानंतर या विवाहित महिलेने स्वतःच्या पतीशी घटस्फोट (Divorce) घेतला. बीडच्या एका व्यक्तीसोबत लग्न केले. चार वर्ष संसार झाला, पण अचानक हा प्रेमी नवरा सगळं सोडून बीडमध्ये पळून आला. त्याच्या शोधात आलेल्या या महिलेला बीडमध्ये मारहाणही झाली, तिला जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. त्यामुळे आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतोय, ती वेळीच पारखून घेतली तर अशी फरपट झाली नसती, अशी भावना सदर महिलेनं व्यक्त केली आहे.

काय अनुराधाची व्यथा?

आज अनुराधा चव्हाण या डोक्याला हात लावून धाय मोकलून अश्रू ढाळत आहेत. मुळच्या मध्यप्रदेशातील वास्तव्यास असलेल्या अनुराधा ह्या पुण्यात रोजगारानिमित्त आल्या. तिथं बीडच्या नितीन चव्हाण या व्यक्तीची ओळख झाली. आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. आधीच विवाहित असलेल्या अनुराधा यांनी पहिल्या पतीसोबत रीतसर घटस्फोट घेऊन नितीन याच्याशी विवाह केला. दोघांच्या संसाराला चार वर्षे पूर्ण झाले होते. दोघेही दिल्लीत एका खासगी कंपनीत नौकरीला होते. मात्र बीडच्या नितीनने दिल्लीतून धूम ठोकत बीड गाठलं. त्याच पतीच्या शोधात अनुराधा बीडमध्ये आल्या. मात्र इथं आल्यानंतर अनुराधा यांना मारहाण झाली. जीवे मारण्याचीही धमकी देण्यात आली. आज त्या शासकीय निवारागृहात सहारा घेतायत.

Beed woman

अनुराधा यांचा पती नितीन तव्हाण

पतीवर गुन्हा दाखल

या प्रकरणी अनुराधा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नितीन चव्हाण याच्यावर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झालाय. गुन्हा दाखल होताच नितीन फरार झाला आहे. प्रेमात धोका दिल्याने पीडिता पुरतीच हतबल झालीये. त्यामुळे बीडच्या शासकीय आधारगृहात तिचे समुपदेशन करण्यात येतेय. मात्र अनुराधा आज व्हॅलेंटाइन डे लाच एकाकी पडलीये. चार वर्षे प्रेमाच्या आणाभाका देणारा तिचा पतीच धोका देऊन पळून गेल्याने तिच्यावर मोठे संकट ओढवले आहे. प्रशासनाने तिच्या पतीचा शोध घेऊन अनुराधा यांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा बीडच्या महिला सामाजिक महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. नितीनच्या प्रेमापोटी संपूर्ण जग सोडून देणारी अनुराधा कदाचित ह्या पहिल्याच महिला नसाव्यात. जगात प्रेमाचे अनेख आदर्श दाखले आहेत. मात्र प्रेम करताना निरखून पाहणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. हेच अनुराधा यांनी केलं असतं तर ही फरफट झालीच नसती.

इतर बातम्या-

Astro tips for travel : मुसाफिर हू यारो म्हणतं प्रवासाला निघताय ? मग वास्तूशास्त्रातील काही नियम लक्षात ठेवा नक्की फायदा होईल

तीन हजार रुपयांवरुन वाद, नातवाकडून आजोबांची हत्या, कुटुंबीय म्हणतात आईच्या दुसऱ्या लग्नाने मुलगा बिथरलेला

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.