AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कळंबमधील त्या मृत महिलेचा संतोष देशमुख प्रकरणाशी संबंध काय? पहिल्यांदाच समोर आली महत्त्वाची माहिती

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या प्रकरणात अनेक नवे खुलासे समोर येत आहेत.

कळंबमधील त्या मृत महिलेचा संतोष देशमुख प्रकरणाशी संबंध काय? पहिल्यांदाच समोर आली महत्त्वाची माहिती
santosh deshmukhImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 31, 2025 | 7:21 PM
Share

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या प्रकरणात अनेक नवे खुलासे समोर येत आहेत. कळंब शहरामध्ये एका घरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.  मनीषा कारभारी बिडवे असे या मृत महिलेचे नाव आहे. या महिलेचा वापर संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी करण्यात येणार होता असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांकडून करण्यात आला आहे. या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान या महिलेचा खरच संतोष देशमुख प्रकरणाशी काही संबंध होता का? या संदर्भात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणावर बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

नेमकं काय म्हणाले पवार? 

कळंबमध्ये जी महिला मृत अवस्थेमध्ये आढळून आली, तपासाअंती तिचा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी अद्याप कोणताही संबंध आढळून आलेला नाहीये. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे, जर या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात काही संबंध आढळला तर त्याची माहिती दिली जाईल.

मनिषा कारभारी बिडवे असं या महिलेचं नाव आहे, तिची हत्या झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. महीलेच्या डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं आहे. महिलेच्या मृत्यू प्रकरणी दोन आरोपी निष्पन्न झाले आहेत, आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आले असून, लवकरात लवकर या प्रकरणातील आरोपीला पकडलं जाईल असं संजय पवार यांनी म्हटलं आहे.

काय आहे अंजली दमानिया यांचा आरोप?  

कळंब शहरामध्ये एका घरात या महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या महिलेचा वापर संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी करण्यात येणार होता असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा यांचा मृतदेह घरात ५ ते ६ दिवसांपासून पडून होता. शेजाऱ्यांना दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर हा प्रकार समोर आला.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.