AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video Samrudhi Highway | उद्घाटनापूर्वीच आशिष देशमुख यांनी समृद्धी महामार्गावरून चालविली कार, समृद्धीवरील प्रवासाने वादाची शक्यता

समृद्धी महामार्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वीच काँग्रेस नेते आशिष देशमुख (Congress leader Ashish Deshmukh) यांनी समृद्धी महामार्गावरून कार चालवली.

Video Samrudhi Highway | उद्घाटनापूर्वीच आशिष देशमुख यांनी समृद्धी महामार्गावरून चालविली कार, समृद्धीवरील प्रवासाने वादाची शक्यता
समृद्धी महामार्गावरून गाडी चालविताना आशिष देशमुख.Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Apr 21, 2022 | 10:38 AM
Share

नागपूर : समृद्धी महामार्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वीच काँग्रेस नेते आशिष देशमुख (Congress leader Ashish Deshmukh) यांनी समृद्धी महामार्गावरून कार चालवली. नागपूरपासून 200 किमोमीटर आशिष देशमुख यांनी समृद्धी महामार्गावरून प्रवास केला. तासी 170 च्या स्पीडने बीएमडब्ल्यू कार चालवली. आशिष देशमुख यांच्या समृद्धीवरील प्रवासाने वाद होण्याची शक्यता (likely to dispute) आहे.

काय म्हणाले देशमुख

यावेळी आशिष देशमुख म्हणाले, विदर्भातील लोकांना माझं आव्हान आहे की, या महामार्गाचा फायदा घ्यावा. विदर्भात औद्योगिकरण करा. विदर्भात बनविलेला माल हा जगात पोहचवा. मेड इन विदर्भाच्या माध्यमातून वस्तू जगापर्यंत पोहचवा. अतिशय चांगला असा हा रस्ता आहे. इथं दोनशेच्या वर स्पीडनी गाड्या चालू शकतात. सरकारनं अतिशय चांगल असं काम या समृद्धी महामार्गाचं केलंय. उद्घाटन झाल्यानंतर या महामार्गाच्या माध्यमातून घराघरापर्यंत समृद्धी आणा.

दोन मेपासून होणार होता सुरू

बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे नागपूरपर्यंत कामं पूर्ण झालंय. बुलडाणा व वाशिम येथील काम सुरूय. मे अखेरपर्यंत समृद्धी महामार्ग प्रवासासाठी खुला करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला देशी झाडं राहणार आहेत. हिरवळीमुळं प्रवास सुखकर व नयनरम्य होणाराय. दोन मे रोजी हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. पण, तत्पूर्वीच या मार्गावरून गाडी चालवून आशिष देशमुख यांनी शिवसेनेचा रोष ओढवून घेतला.

नागपूर ते सेलूपर्यंत काम पूर्ण

समृद्धी महामार्गाचे काम नागपूर ते सेलुपर्यंत झालंय. राज्य सरकार दळणवळणाच्या सुविधा सुरू करण्यासाठी हा महामार्ग लवकरच सुरू करणाराय. पहिल्या टप्प्यात 210 किलोमीटरचा मार्ग सुरू केला जाणाराय. या हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर नागपूर ते मुंबई असा 700 किलोमीटरचा प्रवास फक्त सहा ते सात तासांत पूर्ण होणाराय. स्मार्ट सिटीसाठी काही शेतकऱ्यांनी सुरुवातीला विरोध केला.

Nagpur : नागपूरमध्ये विनाहेल्मेट सरकारी बाबूंवर आजपासून कारवाई, राज्याच्या परिवहन आयुक्तांचे आदेश

Amravati | अचलपूरमधील दोन गटांतील दगडफेक प्रकरण, भाजप शहराध्यक्ष अभय माथनेला तीन दिवस पोलीस कोठडी

Video Nagpur Fire | नागपुरात भरदुपारी दुचाकी पेटली; महाकाली चौकात धुराचे लोळ

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.