AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhandara Crime : नैराश्यातून घर सोडून गेलेल्या व्यक्तीचा वैनगंगा नदीत मृतदेह आढळला

नरेश सिंधी कॉलनी येथे राहतात. गेल्या दोन दिवसापासून ते घरी आले नव्हते. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. मात्र नरेश काहीत पत्ता लागत नव्हता. अखेर कुटुंबीयांनी भंडारा शहर पोलिसात नरेश बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर सोमवारी सकाळी वैनगंगा नदीवरील कारधा पुलाजवळ एक मृतदेह तरंगताना आढळला.

Bhandara Crime : नैराश्यातून घर सोडून गेलेल्या व्यक्तीचा वैनगंगा नदीत मृतदेह आढळला
नैराश्यातून घर सोडून गेलेल्या व्यक्तीचा वैनगंगा नदीत मृतदेह आढळलाImage Credit source: Tv9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Apr 04, 2022 | 3:09 PM
Share

भंडारा : नैराश्यातून घर सोडून गेलेल्या व्यक्तीचे अखेर दोन दिवसानंतर वैनगंगा नदीत मृतदेह (Deadbody) मिळाल्याची घटना भंडारा शहरात घडली आहे. नरेश मखीजा (42) असे मयत इसमाचे नाव आहे. मखीजा याने आत्महत्या (Suicide) केल्याची प्राथमिक माहिती आहे. वैनगंगा नदीवरील कारधा छोट्या पुलाजवळ एक मृतदेह तरंगताना दिसल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढत उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. पोलिस नरेश यांच्या मृत्यूबाबत अधिक तपास करीत आहेत. (The body of a man who left home in despair was found in Wainganga river)

दोन दिवसापासून बेपत्ता होते नरेश माखीजा

नरेश सिंधी कॉलनी येथे राहतात. गेल्या दोन दिवसापासून ते घरी आले नव्हते. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. मात्र नरेश काहीत पत्ता लागत नव्हता. अखेर कुटुंबीयांनी भंडारा शहर पोलिसात नरेश बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर सोमवारी सकाळी वैनगंगा नदीवरील कारधा पुलाजवळ एक मृतदेह तरंगताना आढळला. ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना याची महिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला आणि उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. प्राथमिकदृष्टया नरेश यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पोलिस सखोल तपास करीत आहेत.

अमरावतीत यात्रेत गेलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू

अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा (विठोबा) येथे यात्रेत आलेल्या एका 23 वर्षीय युवकाचा मालखेड तलावाच्या पाण्यात आंघोळ करताना बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. हितेंद्र गजानन भारती असे मयत तरुणाचे नाव आहे. दुपारी शोध व बचाव पथकाने पाण्यातून मृतदेह शोधून बाहेर काढला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक ठाणेदार मगन मेहते हे घटनास्थळी दाखल झाले. श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथे गुढीपाडवा महोत्सव पार पडला. या महोत्सवानिमित्य यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव तालुक्यातील खर्डा गवंडी येथील हितेंद्र भारती आला होता. सावंगा विठोबा गावात असलेल्या मालखेड तलावात तो सकाळी आंघोळीकरीता गेला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो तलावात बुडाला. (The body of a man who left home in despair was found in Wainganga river)

इतर बातम्या

Pune IPL betting : आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, एकाचा शोध सुरू

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख रुग्णालयात, खांद्याच्या शस्त्रक्रियेसाठी अ‍ॅडमिट

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक