AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhandara | धुळवडीनंतर अंघोळीला नदीवर गेला युवक, पोहता येत नसल्याने वैनगंगा नदीत बुडून मृत्यू

तुमसरातील हरीश इलमे 19 वर्षांचा युवक काल रंग लावत होता. रंगाने माखल्यानंतर मित्रांसोबत तो वैनगंगा नदीवर अंघोळीसाठी गेला. पण, तिथं खोल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. माडगी घाटावर ही घटना काल दुपारनंतर घडली.

Bhandara | धुळवडीनंतर अंघोळीला नदीवर गेला युवक, पोहता येत नसल्याने वैनगंगा नदीत बुडून मृत्यू
भंडाऱ्यातील वैनगंगा नदीवर बुडून मरण पावलेला हरीश इलमेImage Credit source: tv 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Mar 19, 2022 | 10:38 AM
Share

तेजस मोहतुरे

भंडारा : कालचा दिवस धुडवळीचा होता. त्यामुळं रंगोत्सवात सारेच रंगले. असाच उत्साह घेऊन हरीश मनीष इलमेनं (19) तुमसरात रंग उधळले. मित्रांसोबत मस्त मज्जा केली. एकमेकांना रंग लावण्यात सारे दंग झाले होते. आता आपण रंगलो. स्वच्छ व्हावं लागेल, यासाठी मग त्यांनी तुमसरवरून (Tumsar) दहा किमीवर असलेल्या माडगी घाटावर (On Madgi Ghat) जाण्याचे ठरविले. माडगी घाट हे वैनगंगा नदीवर आहे. त्याठिकाणी अंघोळीला काही लोकं येतात. सहकारी मित्रांसोबत बजाजनगरातील हरीश इलमे हा देखील गेला. वैनगंगा नदीत (Wainganga river) आंघोळ करत असताना तो खोल पाण्यात जाऊ लागला. त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. मित्र बाजूला होते. तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. नाकातोंडात पाणी गेले. वाचवा… वाचवा असं ओरडला. पण, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

नृसिह मंदिर परिसरातील घटना

ही घटना रेल्वे पुलावजळील नृसिंह मंदिर परिसरात घडली. सोबतचे मित्र घाबरले. काय करावे त्यांना काही सूचले नाही. मित्रांच्या दुचाकी किनाऱ्यावर होत्या. प्रकरण पोलिसांत गेलं. करडी पोलिसांनी घटनेची माहिती हरीशच्या पालकांना दिली. तोपर्यंत सायंकाळ झाली होती. हरीश हा होतकरू तरुण होता. पण, एका चुकीमुळं त्याला जीव गमवावा लागला. आता पश्चाताप करून काही फायदा नाही. गेलेला जीव पुन्हा येणार नाही. म्हणून काळजी घेणे हेच आपल्या हातात असते. पोहायला कुठे जात असाल, तर नवीन ठिकाणी खोल पाण्यात जाऊ नका. अन्यथा होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही.

IMD | चंद्रपुरात पारा भडकला, तापमान 43 डिग्री सेल्सिअसवर, विदर्भात 48 तास उष्णतेच्या लाटेचे!

नागपुरात electric वाहनं हवीत तर जरा थांबा, एक ते तीन महिने वाट पाहा, बुकिंग करून ठेवा

दिलासादायक! यंदा पाणीटंचाई नाही; राज्यातील धरणांमध्ये पुरेशा प्रमाणात जलसाठा

Follow Us
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...