AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला, चार दरवाजे पुर्णपणे बंद

जुलै महिन्यात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असल्यामुळे पीके धोक्यात आली आहेत.

या धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला, चार दरवाजे पुर्णपणे बंद
धरण
| Updated on: Aug 06, 2023 | 12:07 PM
Share

महाराष्ट्र : जून महिना कोरडा गेल्यानंतर अनेक शेतकरी (farmer news) चिंतेत होते. कारण उशिरा पेरणी केल्यानंतर पीक व्यवस्थित येईल का ? अशी त्यांना चिंता होती. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाची (Agricultural department) मदत घेतली होती. जुलै महिन्यात महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस (heavy rain) झाला आहे. त्या जिल्ह्यात अधिक पाऊस झाला आहे. तिथली धरण पुर्णपणे भरली आहेत. ज्या धरणात पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. त्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं आहे.

पाऊस थांबल्यानं पाण्याचा विसर्ग होणार कमी

मागील चार दिवस गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झालं आहे. धरणाचे सर्व दरवाजे उघडले होते. त्यामुळे 1 लाख 87 हजार 204 क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीच्या पात्रात सोडण्यात आला होता. सातत्यानं पाऊस पडत असल्यानं धरणाचे गेट एक मीटरनं वाढविण्याची शक्यता धरण प्रशासनानं व्यक्त केली होती. काल पावसाने विश्रांती घेतल्यामुळे 33 गेट पैकी 4 गेट बंद करण्यात आले आहेत. आता 29 गेट अर्धा मीटरनं उघडून त्यातून 1 लाख 17 हजार 540 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पावसाची परिस्थिती पाहून धरणाचे गेट कमी जास्त प्रमाणात करण्यात येणार असल्यानं नदी काठावरील नागरिकांनी सतर्क रहावं, असं आवाहन धरण प्रशासनानं नागरिकांना केलं आहे.

भंडारदरा धरण 95 टक्के भरले ; मात्र जिल्हयात पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात

अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असलेले भंडारदरा धरण 95 टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे 11 टिएमसी क्षमता असलेले धरण 95 टक्के भरल्याने सगळीकडं आनंदाचे वातावरण आहे. अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर विभागातील शेती उद्योग आणि पिण्याच्या पाण्याची तहान भागवणारे अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण पुर्ण क्षमतेने भरत आले आहे. धरणाचा पाणीसाठा 95 टक्क्यांवर पुढे आहे. विशेष म्हणजे पाणी उसळी मारत असल्यामुळे धरणाच्या भिंतीवरुन पाणी बाहेर पडत आहे. धरण भरल्यामुळं शेतकरी समाधानी आहेत. परंतु पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पिकांना धोका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Follow Us
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री..
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका.
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी.
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार.
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा.
ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण
ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण.
ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट, 'अनेक नेते आमच्या संपर्कात, त्यापैकी...'
ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट, 'अनेक नेते आमच्या संपर्कात, त्यापैकी...'.
बागेश्वर बाबाच्या '४ मुले जन्माला घाला' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस...
बागेश्वर बाबाच्या '४ मुले जन्माला घाला' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस....
विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, शिरसाटांचा मोठा दावा- ठाकरेच उमेदवार
विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, शिरसाटांचा मोठा दावा- ठाकरेच उमेदवार.
राघव चड्ढा यांच्यासारखं... पंजाबमधील घडामोडींवर भाजप नेत्याचं मोठं विध
राघव चड्ढा यांच्यासारखं... पंजाबमधील घडामोडींवर भाजप नेत्याचं मोठं विध.