AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभेच्या अध्यक्षांवर अविश्वास ठराव का आणला? भास्कर जाधवांनी स्पष्टच सांगितलं

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू देत नाही, त्यांच्यावर सर्वच विरोधी पक्षाचे सदस्य नाराजी व्यक्त करत आहे.

विधानसभेच्या अध्यक्षांवर अविश्वास ठराव का आणला? भास्कर जाधवांनी स्पष्टच सांगितलं
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Dec 30, 2022 | 1:50 PM
Share

नागपूर : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला जात आहे. या ठरावावरुन महाविकास आघाडीत मतभेद असल्याची टीका केली जात असल्याने महाविकास आघाडीच अडचणीत आली आहे. यावर ठाकरे गटाचे भास्कर जाधवही संतापल्याचे दिसून आले आहे. विधानसभेच्या अध्यक्षांच्या बाबत अविश्वास ठराव दाखल केला जात असतांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारात घेतले जात नसल्याची चर्चा असतांना त्यांची सही नसल्याचा सवाल भास्कर जाधव यांना विचारण्यात आला होता, त्यावर भास्कर जाधव यांनी संतापातच उत्तर देत चाळीस सदस्यांच्या सह्या असल्याचे जाहीर केले आहे. ज्यावेळेस हा अविश्वास ठराव चर्चेला जाईल तेव्हा सगळेच बोलतील, बाजू मांडतील असे सांगत भास्कर जाधव यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अविश्वास ठराव का आणावा लागला याबाबत स्पष्ट केले आहे. विरोधकांवर कसा अन्याय केला जात आहे याचा पाढाच भास्कर जाधव यांनी वाचला आहे.

भास्कर जाधव म्हणाले की, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निपक्षपातीपणे काम करत नाहीये, असा ठराव आणणे ही दुर्दैवाची बाब आहे.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू देत नाही, त्यांच्यावर सर्वच जण नाराजी व्यक्त करत आहे.

राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत. कुठल्याही पक्षाची त्यांनी बाजू घ्यायला नको, निपक्षपातीपणे त्यांनी काम केलं पाहिजे पण ते दुर्दैवाने होत नाही असे जाधव म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकार यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदाची जागेवर राहुल नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर नार्वेकर यांच्यावर सर्व सदस्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता.

राहुल नार्वेकर हे विधानपरिषदेचे सभापती रामराजेनाईक निंबाळकर यांचे जावई असल्याने त्यांचे विशेष कौतुक केले जात होते.

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान विधानपरिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

त्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांचे निलंबन केल्याने त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...