AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभेच्या अध्यक्षांवर अविश्वास ठराव का आणला? भास्कर जाधवांनी स्पष्टच सांगितलं

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू देत नाही, त्यांच्यावर सर्वच विरोधी पक्षाचे सदस्य नाराजी व्यक्त करत आहे.

विधानसभेच्या अध्यक्षांवर अविश्वास ठराव का आणला? भास्कर जाधवांनी स्पष्टच सांगितलं
Image Credit source: Google
| Updated on: Dec 30, 2022 | 1:50 PM
Share

नागपूर : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला जात आहे. या ठरावावरुन महाविकास आघाडीत मतभेद असल्याची टीका केली जात असल्याने महाविकास आघाडीच अडचणीत आली आहे. यावर ठाकरे गटाचे भास्कर जाधवही संतापल्याचे दिसून आले आहे. विधानसभेच्या अध्यक्षांच्या बाबत अविश्वास ठराव दाखल केला जात असतांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारात घेतले जात नसल्याची चर्चा असतांना त्यांची सही नसल्याचा सवाल भास्कर जाधव यांना विचारण्यात आला होता, त्यावर भास्कर जाधव यांनी संतापातच उत्तर देत चाळीस सदस्यांच्या सह्या असल्याचे जाहीर केले आहे. ज्यावेळेस हा अविश्वास ठराव चर्चेला जाईल तेव्हा सगळेच बोलतील, बाजू मांडतील असे सांगत भास्कर जाधव यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अविश्वास ठराव का आणावा लागला याबाबत स्पष्ट केले आहे. विरोधकांवर कसा अन्याय केला जात आहे याचा पाढाच भास्कर जाधव यांनी वाचला आहे.

भास्कर जाधव म्हणाले की, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निपक्षपातीपणे काम करत नाहीये, असा ठराव आणणे ही दुर्दैवाची बाब आहे.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू देत नाही, त्यांच्यावर सर्वच जण नाराजी व्यक्त करत आहे.

राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत. कुठल्याही पक्षाची त्यांनी बाजू घ्यायला नको, निपक्षपातीपणे त्यांनी काम केलं पाहिजे पण ते दुर्दैवाने होत नाही असे जाधव म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकार यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदाची जागेवर राहुल नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर नार्वेकर यांच्यावर सर्व सदस्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता.

राहुल नार्वेकर हे विधानपरिषदेचे सभापती रामराजेनाईक निंबाळकर यांचे जावई असल्याने त्यांचे विशेष कौतुक केले जात होते.

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान विधानपरिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

त्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांचे निलंबन केल्याने त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

Follow Us
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका.
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?.
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.