AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिका स्वबळावर लढवणार का? नारायण राणेंचे मोठे विधान, म्हणाले “भाजप…”

विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्ष राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांच्या तयारी करत आहेत. त्यातच आता भाजप खासदार नारायण राणे यांनी महापालिका निवडणुकांवर भाष्य केले.

महापालिका स्वबळावर लढवणार का? नारायण राणेंचे मोठे विधान, म्हणाले भाजप...
Image Credit source: ANI
| Updated on: Jan 09, 2025 | 6:36 PM
Share

Narayan Rane on Municipal corporation : लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणुका काही महिन्यांपूर्वी पार पडल्या. या निवडणुकांनंतर आता महापालिकेच्या निवडणुका कधी होणार, असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून महापालिकेच्या निवडणुका कधी होतील, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्ष राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांच्या तयारी करत आहेत. त्यातच आता भाजप खासदार नारायण राणे यांनी महापालिका निवडणुकांवर भाष्य केले.

भाजप खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महापालिका निवडणुकांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी एक मोठे वक्तव्य केले. यापुढे भविष्यात आम्ही निवडणुका स्वबळावर लढू. मुंबई महापालिकेच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढवेल, असे विधान केले आहे.

“भविष्यात निवडणुका स्वबळावर लढू”

आम्ही भविष्यात निवडणुका स्वबळावर लढू. पण कोणती हे सांगू शकत नाही. कोणतेही खातं सांभाळण्यासाठी नितेश राणे सक्षम आहे. ज्याने बांगलादेशीला जन्माचा दाखला दिला, त्या अधिकार्‍यावर कारवाई व्हावी. राजन साळवी मार्गावर असल्यास पक्ष विचार करेल, असे नारायण राणे म्हणाले.

“मुंबईत भाजपची प्रचंड ताकद”

“शरद पवारांचा आरएसएसने कौतुक केल्यास त्यात वावगे काही नाही. भाजपाचे चांगले दिवस त्याचे तुम्ही स्वागत केलं पाहिजे. लोकांना विकास दिसत आहे. त्यामुळे पक्षप्रवेश होत आहेत. मुंबई महानगरपालिका भाजप स्वबळावर लढवेल. मुंबईत भाजपची प्रचंड ताकद आहे. कोणत्या भागात, कोणती इंडस्ट्री उभारावी याबाबतीत उदय सामंत आणि माझ्यात चर्चा झाली”, असे नारायण राणेंनी म्हटले.

दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर आता आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी पालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. स्वतंत्र लढून कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे, असं वक्तव्यही संजय राऊतांनी केलं होतं. त्यानंतर सुषमा अंधारेंनी निवडणुका स्वबळावर लढायच्या की, एकत्र याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील अशी प्रतिक्रिया दिली होती. तसेच महायुती म्हणून मुंबई पालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं होतं. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढू, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले होतं.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला