AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडला विकासाचा रोडमॅप, दीड तासांच्या भाषणामध्ये नेमकं काय म्हणाले?

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप देखील मांडला.

मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडला विकासाचा रोडमॅप, दीड तासांच्या भाषणामध्ये नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 26, 2026 | 2:55 PM
Share

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, यावेळी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याच्या विकासाचा रोडमॅप मांडला सोबतच विरोधकांवर देखील जोरदार हल्लाबोल केला. विरोधी पक्षाचा सूर पाहिल्यावर वाटलं ते भ्रमीतही आहे आणि संभ्रमितही आहे.  लोकांना काही मुद्द्यावर संभ्रमीत करायचे म्हणून मुद्दे मांडले जात आहेत.  ट्रिलियन डाॅलर इकोनाॅमीबद्दल बोललं जातं आहे. पण आमच्या मनात त्याबद्दल शंका नाही.  भास्कर जाधव यांनी अनेक गोष्टी मांडल्या. शिवरायांचा,  टिपू सुलतानचा विषय मांडला. टिपू सुलतान चांगले की वाईट यासंदर्भात मुद्दाच नाही. आमचा आक्षेप टिपू सुलतानाची महाराजांसोबत तुलना करण्यात आली त्याला आहे, असा हल्लाबोल यावेळी फडणवीसांनी विरोधकांवर केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  जीडीपीच्या तुलनेत किती कर्ज असावे? यात देशात सर्वात उत्तम पॅरॅमिटर्स आपले आहेत.  जीडीपीतील वाटा कमी झाला वगैरे असं बोलले गेले, मात्र ते रिलेटिव्ह असतं.  २०२१-२२ मध्ये देशातील जीडीपीत आपली टक्केवारी १३.१ टक्के, २०२२-२३ १३.५ टक्के, २०२३-२४ मध्ये १३.८ टक्के तर २०२४-२५ मध्ये १४ टक्के इतकी आहे. जीडीपीमध्ये आपला वाटा वाढत आहे.  जीडीपीच्या कर्जाच्या सगळ्या पॅरॅमिटर्स महाराष्ट्राने पूर्ण केल्या आहेत, अर्थव्यवस्था समजणाऱ्या नेत्याला आकडेवारी समजून सांगणे योग्य नाही. असं म्हणत त्यांनी यावेळी जयंत पाटील यांना टोला देखील लगावला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  जीडीपीत आपली हिस्सेदारी वाढत आहे.  आता दहा औद्योगिक राज्य असली तरीही आपला वाटा वाढतोय.  मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवा हे आपण करतोय. विरोधकांची कॅसेट गुजरातवरच अडकली आहे. 2022 पासून तेच ते उद्योग बाहेर गेलेत असं विरोधक सांगत आहेत. त्यांनी अभ्यास करून विषय मांडले तर बरं होईल. विरोधक गोबेल्सचं तत्व अवलंबत आहेत.  हे सरकार 2029 पर्यंत आहे, पुढच्या टर्मला पण आमचंच सरकार येईल, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान  २०३४, २०४७ चे विकसित महाराष्ट्राचे डॉक्युमेंट पाहा,  प्रत्येक जिल्ह्याचा आराखडा तयार केला आहे.  २५ टक्के निधी त्यासाठी डीपीडीसीला द्यावा लागेल.  प्रत्यक्ष तो कार्यान्वित करत आहोत.  २०४७पर्यंत ५ ट्रिलियनची अर्थव्यवस्था करायची आहे.  दरवर्षी १० लाख रोजगार निर्मिती करायची आहे. प्रगत तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, वित्तीय शिस्त व शाश्वत विकास या माध्यमातून वित्तीय तूट अडीच टक्क्याखाली आणायची आहे,  पर्यायी उत्पन्नाचे स्त्रोत शोधायचे आहेत.  एक व्हिजन मॅनेजमेंट युनिट आपण तयार केले आहे, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…