AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील 100 महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रं सुरु करणार, मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

तरुणांना रोजगार मिळावा यासाठी राज्यातील जवळपास 100 महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्याचा निर्णय कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घेतला आहे. त्यामुळे 1

राज्यातील 100 महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रं सुरु करणार, मंगलप्रभात लोढा यांची घोषणा
Mangal prabhat Lodha
| Updated on: Jan 01, 2024 | 6:56 PM
Share

विनायक डावरूंग, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 1 जानेवारी 2023 : महाराष्ट्रातील तरुणांना महाराष्ट्र राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नववर्षांची भेट दिली आहे. मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्राच्या युती सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. 15 ते 45 वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनवण्यासाठी कौशल्य विकास सोसायटीमार्फत प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहेत. या योजनेद्वारे महाराष्ट्रातील 100 महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. याचा फायदा तरुणांना रोजगार मिळण्यास होणार आहे.

राज्यातील ग्रामीण भागात कौशल्य विकास केंद्र असावे असे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे ध्येय्य होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच देशात 511 कौशल्य विकास केंद्राचे एकाच वेळी उद्घाटन झाले. या कौशल्य विकास केंद्रांमार्फत गावातील नागरिकांना रोजगार मिळणार आहे. नवे कौशल्य शिकण्याची समान संधी मिळणार आहे. त्यामुळे नोकरीसाठी गावातून शहराकडे होणार स्थलांतर कमी होण्यास मदत होणार आहे. आता नवीन 100 कौशल्य विकास केंद्रामुळे महाराष्ट्राती कौशल्यसंपन्न संपन्न तरुणाची पिढी तयार करणे शक्य होणार आहे. या केंद्रांद्वारे रोजगारासाठी आवश्यक अभ्यासक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य महाविद्यालयांना असणार आहे. हे अभ्यासक्रम नॅशनल स्कील क्वालीफिकेशन फ्रेमवर्कशी ( National Skill Qualification Framework ) सुसंगत असतील. त्यासाठी केंद्र शासनातर्फे निश्चित केलेल्या कॉमन कॉस्ट नॉर्म्स ( Common Cost Norms ) नुसार प्रशिक्षण शुल्क देण्यात येईल.

तरुणांच्या जीवनात नवीन पहाट

कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे देशातील युवकांच्या जीवनात नवी पहाट उगवेल. विकसित भारत घडवण्यासाठी या प्रशिक्षणाची महत्वपूर्ण भूमिका राहील. आपल्या तरुण पिढीला रोजगारक्षम बनवण्यासाठी तरुण पिढीला कौशल्य प्रशिक्षणाकडे वळवणे अतिशय महत्वाचे रहाणार आहे. त्यादृष्टीने कौशल्य केंद्रांचे निर्मिती करण्यात आली आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.