AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“…म्हणून संभाजीनगरमध्ये या दिवशी सावरकर सन्मान रॅली”; या नेत्यानं भाजपची रणनीती दाखवून दिली

महाविकास आघाडीची सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. त्याचवेळी भाजपकडून सावरकर सन्मान रॅलीही काढण्यात येणार असल्याचे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

...म्हणून संभाजीनगरमध्ये या दिवशी सावरकर सन्मान रॅली; या नेत्यानं भाजपची रणनीती दाखवून दिली
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: महादेव कांबळे | Updated on: Mar 29, 2023 | 4:40 PM
Share

नांदेड : राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वक्तव्य केले राज्यासह देशातील राजकारण प्रचंड तापले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासाठी आता भाजप आक्रमक होत त्यांच्यासाठी आता ठिकठिकाणी सन्मान रॅली काढण्यात येत आहे. या सन्मान रॅलीवरूनच आता राजकारण केले जात आहे.याच सन्मान रॅलीविषयी काल खासदार अमोल कोल्हे यांनीही टीका केली होती. ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि सावित्राबाई फुले यांच्याविषयी राज्यपालांनी वक्तव्य केली होती.

त्यावेळी का सन्मान रॅली काढण्यात आली नाही असा सवाल अमोल कोल्हे यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला केला होता. त्याच मुद्यावरून आता ठाकरे गटाकडून हल्लाबोल केला जात आहे. 

खासदार चंद्रकांत खैरे यांनी सावरकर सन्मान रॅलीविषयी बोलताना सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी फक्त भाजप आणि शिंदे गटाला राजकारण करायचे आहे. सावरकर यहे नाव फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी वापरायचे आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.

काँग्रेसचे राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वक्तव्य केले. त्यानंतर राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल भाजपने ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलन करून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. तर राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई मागे घेण्यासाठा काँग्रेसकडून वर्षभर आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

त्यामुळे राहुल गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. त्यावर ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी बोलताना सांगितले की, भाजपला सावरकर यांच्या नावाचा वापर फक्त राजकारणासाठी करायचा आहे. तर दुसरीकडे सावरकर यांना भारतरत्न द्या या मागणीकडे मात्र दुर्लक्ष करायचे आहे असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

चंद्रकांत खैरे यांनी सांगितले की, सावरकर यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी आम्ही वेळोवेळी संसदेत केली आहे. मात्र त्याकडे मोदी आणि फडवणीस यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही.

त्यामुळे सावरकर यांचे नातू म्हणतात त्याप्रमाणे सावरकरांचे नाव केवळ राजकारणासाठी वापरले जात आहे. सध्या सावरकर यांच्यावरून सुरू असलेल्या वादावर खैरे नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

त्यावेळी त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडीची सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. त्याचवेळी भाजपकडून सावरकर सन्मान रॅलीही काढण्यात येणार असल्याचे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

Follow Us
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!