AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्मृती मानधनाचं लग्न ज्या सांगली शहरात होणार होतं; आहे या खास कारणासाठी जगप्रसिद्ध; 99%लोकांना बसेल धक्का

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नामुळे जास्तच चर्चेत आला आहे. सांगली हा महाराष्ट्रातील एक छोटा जिल्हा आहे. पण तरी देखील या जिल्ह्याबाबत अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या लोकांना माहित नाहीयेत. तसेच हे शहर अशा बऱ्याच कारणांसाठी प्रसिद्ध आहे ज्याची कोणी कल्पना केली नसेल.

स्मृती मानधनाचं लग्न ज्या सांगली शहरात होणार होतं; आहे या खास कारणासाठी जगप्रसिद्ध; 99%लोकांना बसेल धक्का
characteristics of Sangli district,Image Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Nov 23, 2025 | 5:29 PM
Share

भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा आज 23 नोव्हेंबर 2025 रोजी सांगलीत होणार होता. त्याची जय्यत तयारी झाली होती. मात्र त्याआधीच एक दुर्दैवी घटना घडली. ती म्हणजे स्मृती मानधनाच्या वडिलांना हार्टअटॅक आल्याची. लग्नाची तयारी सुरु असताना अचानक ही घटना घडल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची तब्येत स्थीर असल्याचं म्हटलं जात आहे. पण तोपर्यंत लग्नसोहळा पुढे ढकलला आहे.

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नामुळे सांगली जिल्हा जास्तच चर्चेत 

सांगली हा महाराष्ट्रातील एक छोटा जिल्हा आहे. अलिकडेच स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नामुळे सांगली जिल्हा जास्तच चर्चेत आला आहे. सांगली हे एक खूप प्रसिद्ध ठिकाण आहे, तरीही लोकांना त्याबद्दलच्या अनेक अशा मनोरंजक गोष्टी बऱ्याचजणांना माहित नाहीत. सांगली हे कृष्णा नदीजवळ वसलेले महाराष्ट्रातील एक छोटे शहर आहे. पण ते जगभर भारताचे हळदीचे शहर आणि भारताचे पिवळे शहर म्हणून ओळखले जाते. कारण हे शहर केवळ भारतातच नाही तर संपूर्ण आशियामध्ये सर्वाधिक प्रमाणात मसाले तयार करते. आणि नक्कीच याबद्दल अनेकांना माहित नसेल.

सांगलीतील हे मंदिर प्रमुख आकर्षण 

सांगलीतील गणेश मंदिर देखील खूप प्रसिद्ध आहे. अनेक दशकांपासून हे मंदिर एक प्रमुख आकर्षण आहे. सांगलीचे पहिले शासक चिंतामण राव पटवर्धन यांनी 1843 मध्ये बांधलेले हे गणेश मंदिर असून या मंदिरात बाप्पाची तांब्याची मूर्ती आहे. जी मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यातून दिसते. हे मंदिर पेशवे स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना देखील मानले जाते.

मंदिराचे वैशिष्ट्य काय आहे?

मुख्य म्हणजे हे गणेश मंदिर ज्योतिबा टेकड्यांमधील दगडांचा वापर करून बांधले गेल्याचं म्हटलं जातं. जे भगवान शिवाचे अवतार ज्योतिबा यांच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. गणेश मंदिराचे प्रवेशद्वार देखील त्याला एक वेगळी ओळख देते. प्रवेशद्वार वेगवेगळ्या रंगांच्या नैसर्गिक लाकडावर कलाकृतींनी कोरलेले आहे.

खाद्यसंस्कृतीसाठी सांगली तेवढीच प्रसिद्ध 

सांगली ही खाद्यसंस्कृतीसाठी देखील तेवढीच प्रसिद्ध आहे. जसं की, सांगली जिल्ह्यामध्ये भडंग प्रसिद्ध आहे. तसेच तेथील मनुका प्रसिद्ध आहेत. याव्यतिरिक्त सांगलीत सर्वात जास्त प्रसिद्ध असेल तर ते द्राक्षे. सांगली जिल्ह्यात द्राक्षे आणि ज्वारी यांसारखी पीके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात.

Follow Us
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge.....
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge..... त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण!
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत