AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दम राहिला नाही, सगळी हवा गेली.., भुजबळांनी पुन्हा जरांगे पाटलांना डिवचलं

मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

दम राहिला नाही, सगळी हवा गेली.., भुजबळांनी पुन्हा जरांगे पाटलांना डिवचलं
| Updated on: Jul 24, 2025 | 7:59 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला आहे, त्यांनी अंतरवाली सराटीमधून आपल्या आंदोलनाला सुरुवात केली होती, त्यानंतर त्यांना राज्यभरातून पाठिंबा मिळाला. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेकदा उपोषण देखील केलं आहे.  दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली असून, येत्या 29 ऑगस्ट रोजी मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे.

मात्र त्यापूर्वी बोलताना ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते माढामधील अरण गावामध्ये श्रीफळ दही हंडी सोहळ्याला आले असताना बोलत होते, दरम्यान छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यामुळे आता वातावरण तापण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ?   

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मी थोडी देखील किंमत देत नाही, जरांगे पाटील यांच्यामध्ये काही दम राहिलेला नाही, त्यांची सगळी हवा गेलेली आहे. मराठा समाजाला सरकारने 10 टक्के आरक्षण दिलेलंच आहे, मराठा समाजाला देखील कळून चुकले आहे की, जरांगेंमध्ये आता दम उरला नाही, अशी खोचक टीका यावेळी भुजबळ यांनी केली आहे.

दरम्यान गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये  सर्वांना सांगितलं उमेदवार उभे करायचे आहेत.सर्वांचे फार्म मागितले. मग म्हटले ठरवतो, आणी नंतर सांगितले माघार घेतली. ते फक्त माझ्या मतदार संघात येवल्यामध्ये आले, पण लोकांनी काही त्यांचं ऐकलं नाही, मला चांगल्या मतांनी निवडून दिलं, असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.

29 ऑगस्टला मोर्चा

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे, हा मोर्चा पुर्वीच्या मोर्चापेक्षा पाच पट मोठा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मराठा बांधवांचा मोर्चा येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार आहे.

Follow Us
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक