AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TET पेपर फुटप्रकरणात सरकार अँक्शन मोडवर, एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश

टीईटीचा पेपर उद्या रविवारी, २८ जून २०२६ रोजी होणार असतानाच आधल्या दिवशी फुटल्याने लाखो उमेदवारांच्या तयारीवर पाणी फेरले आहे. या प्रकरणात आता राज्य सरकारने एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

TET पेपर फुटप्रकरणात सरकार अँक्शन मोडवर, एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश
cm devendra fadnavis
| Updated on: Jun 27, 2026 | 8:44 PM
Share

राज्यातील भावी शिक्षकांसाठीची टीईटी परीक्षा अवघ्या २४ तासांवर असताना तिचा पेपर फुटल्याने उद्या रविवारी ( २८ जून २०२६ ) होणारी ही परीक्षा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली होती. या परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर राज्यातील पाच लाखाहून अधिक उमेदवारांची मेहनतीवर पाणी फेरले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचा आदेश दिला आहे. ठाण्याचे जॉईंट सीपी पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेत ही SIT स्थापन करण्यात येणार आहे. TET पेपर फुटीच्या प्रकरणी सरकार आता अँक्शन मोडवर असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांना फोन करून एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणात अत्यंत कठोर कारवाई करा आणि कुणाचीही गय करू नका असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांचा दादा भुसे यांनाही फोन

या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना ही फोन केला आहे.त्यांच्याकडून या प्रकरणातील घडामोडी जाणून घेतल्यानंतर त्यांना सूचना केल्या आहेत. या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चा करुन या प्रकरणातील सूत्रधारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करणार असे म्हटले आहे.

टीईटी परीक्षा नकोच !

उद्या रविवारी होणारा टीईटीचा पेपर फुटल्याने तो रद्द करण्यात आला आहे. मात्र, आता ही टीईटीची परीक्षा नकोच असल्याची मागणी शिक्षक महासंघ मुंबई आणि कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली आहे. दैनंदिन अध्यापनाचा आणि टीईटी परीक्षेचा दुरान्वेही संबंध नसल्याने ही टीईटी परीक्षाच रद्द करण्याची मागणी आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांच्याकडे करणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी म्हटले आहे.

आधीच दैनंदिन अध्यापनाबरोबरच बीएलओची कामे शिक्षकांच्या माथी मारल्याने या शैक्षणिक कामांमुळे शिक्षक त्रस्त झाले असून शिक्षकांना कोणी वालीच राहिला नाही. सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात टीईटी तसेच बीएलओच्या कामांबाबत राज्यातील सर्व विधानसभेचे आमदार आणि विधान परिषद सदस्यांकडे शिक्षक महासंघाच्या माध्यमातून निवेदन देणार असल्याचेही अनिल बोरनारे यांनी म्हटले आहे.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं